crop registration : प्रत्येक हंगामात १०० टक्के पीक नोंदणी बंधनकारक

मुंबई : राज्यात राबविण्यात येत असलेल्या ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्पाला अधिक गती देण्यासाठी आणि त्यात पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. केंद्र सरकारच्या ‘अॅग्रीस्टॅक’ संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महसूल व वन विभागाने शुक्रवारी एक सविस्तर शासन परिपत्रक निर्गमित केले असून, यात जिल्हाधिकाऱ्यांपासून ते तलाठ्यांपर्यंत सर्वांच्या जबाबदाऱ्यांची निश्चिती केली आहे. विशेष म्हणजे, आता प्रत्येक हंगामात १०० टक्के पीक नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.


जिल्हा स्तरावर या संपूर्ण प्रक्रियेची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असेल. गावांमधील खरीप आणि रब्बी पिकांची वर्गवारी करण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले आहेत. प्रत्येक गावासाठी तहसीलदारांमार्फत एका ‘पीक पाहणी सहायका’ची नेमणूक केली जाणार असून, या सहायकाने केलेल्या नोंदींची १०० टक्के पडताळणी करण्याची जबाबदारी संबंधित तलाठ्याकडे (ग्राम महसूल अधिकारी) सोपवण्यात आली आहे. शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रशासनाने आता आधुनिकतेची कास धरली आहे. केवळ आकाशवाणी किंवा स्थानिक वृत्तवाहिन्यांवर अवलंबून न राहता फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप आणि विशेषतः 'रील्स'च्या माध्यमातून ‘ई-पीक पाहणी’चे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. इतकेच नव्हे, तर शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून थेट शेतकरी कुटुंबांपर्यंत पोहोचण्याची रणनीतीही आखण्यात आली आहे.


या प्रकल्पाचे तांत्रिक नेतृत्व पुण्यातील जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख कार्यालयाकडे सोपवण्यात आले आहे. मोबाईल ॲप्लिकेशनची कार्यक्षमता, माहितीची सुरक्षा, गोपनीयता आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण या बाबींची जबाबदारी या कार्यालयाची असेल. तसेच, कृषी आयुक्तालयांतर्गत स्थापन झालेल्या ‘अॅग्रीस्टॅक संचालनालया’मार्फत राज्यभरातील प्रगतीचा आढावा घेतला जाईल. एमआयएस डॅशबोर्डच्या मदतीने ज्या तालुक्यांमध्ये काम संथ आहे, तिथे विशेष मोहिमा राबवल्या जातील.

Comments
Add Comment

Narayan Seva Sanstha : नारायण सेवा संस्थेकडून मुंबईच्या वडाळा येथील निको हॉलमध्ये १०४ दिव्यांगांना १५४ कृत्रिम अवयवांचे मोफत वाटप

मुंबई : दिव्यांगजनांचे पुनर्वसन, आरोग्य सेवा आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी समर्पित असलेल्या भारतातील अग्रगण्य

BMC : नाना शंकरशेठ यांच्या स्मारक उभारणीची प्रतीक्षा संपली, महापालिका स्वनिधीतून उभारणार स्मारक

बांधकामासाठी कंत्राटदाराची अखेर निवड मुंबई (सचिन धानजी) : आधुनिक मुंबईचे शिल्पकार, शिक्षणप्रेमी आणि समाजसुधारक

BMC : नालेसफाईचे काम १०० टक्के तर मग गाळ आणि कचऱ्याचे तुडुंब नाले भरलेले कसे?

मनसेचे महापालिका गटनेते यशवंत किल्लेदार यांचा सवाल मुंबई (विशेष प्रतिनिधी): सत्ताधारी आणि प्रशासन कितीही ओरडून

BMC News : मुंबईत १,१२४ दुकानांना मराठीतील फलकांची ऍलर्जी

महिनाभरात ३५ हजारांहून अधिक दुकानांच्या तपासणीतून झाले उघड मुंबई : मराठी भाषेतील नामफलक सक्तीच्या

BMC : महापालिकेच्या किती कर्मचाऱ्यांनी अद्यापही जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही

स्थायी समिती सदस्याने केली विचारणा समितीपुढे माहिती सादर करण्याची केली मागणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई

Artificial intelligence (AI) : एआयने शोधली कंत्राटदारांची हातचलाखी

नालेसफाई कामांमध्ये कंपन्यांना ९.२५ कोटी रुपयांचा दंड मुंबई : नाले स्वच्छतेच्या कामात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)