अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. न्यायमूर्ती वर्मा यांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे ...
शुक्रवारी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास बांके बिहारी मंदिरापासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या केशी घाटाजवळ हा अपघात झाला. नदीतील पुलाजवळ भाविकांनी भरलेली ही नौका अचानक उलटली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि मदत व बचाव पथकांनी तातडीने धाव घेतली.
मुंबई : सध्या व्हॉट्सॲप (WhatsApp) च्या प्रायव्हसी आणि सिक्युरिटीबाबत मोठा वाद समोर आला आहे. टेलिग्राम (Telegram) चे सीईओ पावेल दुरोव (CEO Pavel Durov) आणि टेस्लाचे मालक एलोन ...
मथुरेचे जिल्हाधिकारी चंद्र प्रकाश सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, यमुना नदीत शोधमोहीम सातत्याने सुरू असून गोताखोर बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत. जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या नौकेत ३० हून अधिक प्रवासी होते आणि हे सर्व पर्यटक पंजाबमधील लुधियाना येथून वृंदावन दर्शनासाठी आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. "ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींच्या लवकरात लवकर प्रकृती सुधारावी यासाठी मी प्रार्थना करतो," असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.