Chhattisgarh Accident : छत्तीसगड हादरलं! लग्नावरून परतताना भीषण अपघात; ६ ठार, ३ गंभीर जखमी

छत्तीसगडमधील कांकेर (Chhattisgarh Accident) जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी (९ एप्रिल) उशिरा रात्री नाथिया नवागावाजवळ दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.



नेमकं प्रकरण काय ?


कोतवाली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात (Chhattisgarh Accident) झाला. मृत कुटुंब कांकेरमधील उडकुडा येथील रहिवासी होते. सांगितले जात आहे की, सर्वजण चीवरांज येथे लग्न समारंभाला उपस्थित राहून आपल्या गावाकडे उडकुडाला परतत होते. त्यावेळी नाथिया नवागावाजवळ त्यांच्या गाडीची दुसऱ्या गाडीशी धडक झाली. दोन्ही गाड्या वेगात होत्या आणि धडक इतकी भीषण होती की वाहनांचे तुकडे तुकडे झाले.


गाडीमधील एकाच कुटुंबातील ३ महिला, २ पुरुष आणि एका मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या गाडीमधील ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.



सर्वांची प्रकृती गंभीर :


घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी (Chhattisgarh Accident) पोहोचले आणि जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कांकेरचे पोलीस अधीक्षक निखिल राखेचा यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. अपघातातील तिन्ही जखमींना तातडीने अॅम्ब्युलन्सच्या मदतीने जिल्हा रुग्णालय कांकेर येथे हलविण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, सर्वांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. सध्या पोलीस संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत असून अपघाताचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.



पोलिसांकडून पुढील चौकशी सुरु :


कांकेरचे पोलीस अधीक्षक निखिल राखेचा यांनी सांगितले की, नाथिया नवागावाजवळ दोन गाड्यांच्या धडकेत (Chhattisgarh Accident) सहा जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी आहेत. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असून मृतांची ओळख पटवणे आणि इतर माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. जखमींवर उपचार झाल्यानंतर त्यांच्याकडूनही माहिती घेतली जाणार आहे. मृतदेहांचा पंचनामा करून पोस्टमॉर्टमसाठी मॉर्चुरीमध्ये ठेवण्यात आले असून, पोस्टमॉर्टमनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. (Chhattisgarh Accident)

Comments
Add Comment

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी

Supreme Court : 'त्या' प्रकरणात आसारामला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; अंतरिम जामीनावर तत्काळ सुनावणीस नकार

Supreme Court : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसारामला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का

Assam Rain : ईशान्य भारतात पावसाचा कहर! आसाममध्ये महापूराने रेल्वे पूल वाहून गेला; २२ हजार नागरिक बेघर, १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला

- ६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम गुवाहाटी : ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान

NEET Case : नीटप्रकरणी १० आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली: नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू