Bmc News : येत्या मे महिन्यापासून मुंबईकरांवर पाणीकपात

किमान १० टक्के होणार पाणी पुरवठ्यात कपात


मुंबई : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये सध्या ३५ टक्के पाणी साठा असून मागील दोन वर्षांच्या तुलनेत हा पाणी साठा चांगल्याप्रकारे असला तरी प्रत्यक्षात पावसाळ्याचे गणित पाहता मुंबई महापालिकेला पाणीकपात करण्याची गरज भासणार आहे. त्यातच राज्य शासनाने महापालिकेला ऑगस्टपर्यंत पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्याचे निर्देश दिल्यामुळे येत्या १ मेपासून मुंबईत किमान १० टक्के कपात करण्याचा महापालिका प्रशासनाचा विचार आहे. त्यामुळे येत्या महिन्यात पुढील पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्याच्यादृष्टीकोनातून ही कपात जाहीर केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असून सध्या मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा,भातसा, विहार आणि तुळशी यासर्व धरणांमध्ये केवळ ५ लाख २० हजार ६९८ दशलक्ष लिटर पाण्याचा साठा आहे. टक्केवारीच्या तुलनेत हा पाणी साठा ३५ टक्के एवढा आहे. त्यामुळे सध्या असलेला पाणी साठा हा १५ जूनपर्यंत पुरणार असून पुढील कालावधीत पाऊस लांबणीवर पडण्याचाही हवामान खात्याचा अंदाज आहे. अल लिनोच्या वादळी संकटामुळे पाऊस लांबणीवर जाण्याचीही शक्यता असल्यामुळे भविष्यात पावसाळ्यात सर्व धरणांमध्ये पुरेसा पाणी साठा होईपर्यंत या पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे. त्यादृष्टीकोनातून महापालिका जल अभियंता विभागाने पाणीकपात करण्याचा विचार केला आहे. त्यासाठी कमीत कमी १० टक्के पाणीकपात करण्याचा विचार करण्यात आला असून लवकर हा प्रस्ताव लागू करुन सर्वांच्या मान्यतेने याची अंमलबजावणी केली जाणार आहे.



मागील वर्षी पाण्याचा साठा कमी झाल्यानंतरही शासनाने भातसा धरणातील अतिरिक्त पाणी देण्याची तयारी दर्शवल्यामुळे पाणीकपात करण्यात आली नव्हती. परंतु यंदा पाऊस लांबणीवर पडण्याची भीती असल्यामुळे शासनाकडून भातसाचेही अतिरिक्त पाणी मिळण्याची शक्यता नाही. याउलट महापालिकेला आपल्या धरणातील राखीव पाणी साठाही वापरण्याची गरज भासणार आहे. याचीही मंजुरी प्राप्त करून या पाण्याचा वापर करण्याची रणनिती आखली जात आहे. त्यामुळे मुंबईकरांना येणाऱ्या काळात किमान दहा टक्के पाणीकपातीला सामोरे जावे लागेल,असा अंदाज वर्तवला जात आहे.



दिनांक ९ एप्रिलच्या दिवसापर्यंतचा पाणी साठा


सन २०२६ : ५ लाख २० हजार ९९८(३५.९८)


सन २०२५ : ४ लाख ७० हजार १०७(३२.४८)


सन २०२४ : ३ लाख ९० हजार ३४७(२६.९८)

Comments
Add Comment

Cyber Crime : मुंबईत सायबर गुन्ह्यातील १०० कोटी वाचविण्यात यश

मुंबई : गेल्या काही वर्षांत सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सायबर पोलिसांनी

आता गावकऱ्यांना मिळणार मोफत मिळकत पत्रिका

सनद फी माफ करण्याची महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा; ग्रामविकास विभाग प्रस्ताव तयार करणार मुंबई : ग्रामपंचायत

वाई येथे लघुकुंभमेळ्याचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न

वाईच्या लघुकुंभ मेळ्याची महती संपूर्ण राज्यात पसरणार:-जयकुमार गोरे सातारा वाई नगरीला “दक्षिण काशी” अशी ओळख

गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्यांना आता 'मकोका' लागणार!

गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी; बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कारवाईसाठी संयुक्त भरारी पथके आणि सीमांवर

वरिष्ठांनी भाजपसोबत जायचे ठरवल्यास दुसरा पर्याय निवडेन!

आ. रोहित पवार यांचा दावा; आजोबा आणि आत्याला दिला इशारा मुंबई : सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय

एकनाथ शिंदेंकडून २०२९ साठी स्वबळाची चाचपणी?

२०० मतदारसंघात संघटनात्मक बांधणी सुरू; मंत्री उदय सामंत आणि श्रीकांत शिंदेंवर सोपवली मोठी जबाबदारी मुंबई :