Green Asha Indian Ship : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ‘ग्रीन आशा’ मुंबईत दाखल

- होर्मुझ पार करत १५ हजार टन एलपीजीचा पुरवठा


मुंबई : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतीय तेलवाहू जहाज 'ग्रीन आशा' (Green Asha Indian Ship) आज म्हणजेच गुरुवार ९ एप्रिल रोजी मुंबईत दाखल झाले आहे. १५,००० टन एलपीजी घेऊन जाणारे हे जहाज मुंबईत आले आहे. या भारतीय जहाजाने होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडून मुंबईत प्रवेश केला आहे.


इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी जाहीर करण्यात आली आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची घोषणाही केली आहे. परिणामी, या काळात आणखी बरीच जहाजे भारतात येऊ शकतात.


'ग्रीन आशा' हे (Green Asha Indian Ship) जहाज १५,४०० टन एलपीजी घेऊन नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी (जेएनपीए) येथे दाखल झाले आहे. जेएनपीएने म्हटले आहे की; "भारतीय ध्वज असलेल्या 'ग्रीन आशा' या एलपीजी जहाजाचे स्वागत करण्यात आले. या जहाजाने होर्मुझची सामुद्रधुनी यशस्वीपणे पार करून बीपीसीएल-आयओसीएलद्वारे संचालित जेएनपीएच्या लिक्विड बर्थवर नांगर टाकला."


'ग्रीन आशा'चे (Green Asha Indian Ship) आगमन महत्त्वपूर्ण आहे, कारण युद्ध सुरू झाल्यापासून होर्मुझची सामुद्रधुनी पार करून जेएनपीएमध्ये पोहोचणारे हे अशा प्रकारचे पहिलेच जहाज आहे. हे जहाज १५,४०० टन एलपीजी घेऊन आले आहे. प्राधिकरणाने म्हटले आहे, "जहाज, त्यावरील माल आणि सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत. हे आगमन गुंतागुंतीच्या भू-राजकीय परिस्थितीतही सागरी कारवायांची कार्यक्षमता दर्शवते आणि देशाला अत्यावश्यक एलपीजीचा अखंड पुरवठा सुनिश्चित करते."


दरम्यान इराणकडून होर्मुज सामुद्रधुनी संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. इराणने आता जहाजांच्या वाहतुकीसाठी पर्यायी समुद्री मार्गांची घोषणा केली आहे.



सामुद्रधुनीचे पर्यायी मार्ग :


प्रवेश मार्ग : ओमान समुद्रातून होर्मुज सामुद्रधुनीत (Strait of Hormuz) प्रवेश करणारी जहाजे आता लारक बेटाच्या उत्तरेकडील भागातून प्रवास करतील. त्यानंतर ती पर्शियन आखाताच्या दिशेने पुढे जातील. संभाव्य धोक्यांपासून बचाव करत सुरक्षित प्रवेश मिळावा हा या मार्गाचा उद्देश आहे.


निर्गमन मार्ग : आखातातून बाहेर पडणाऱ्या जहाजांसाठीही नवीन मार्ग निश्चित करण्यात आला आहे. ही जहाजे लारक बेटाच्या दक्षिणेकडील भागातून ओमान समुद्राच्या दिशेने रवाना होतील.


इराणचे म्हणणे आहे की, या नव्या मार्गांचा उद्देश जहाजांना सुरक्षित आणि अखंड प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. जलमार्गात कोणतीही अप्रिय घटना टाळणे आणि आंतरराष्ट्रीय नौवहन सुरळीत ठेवणे, या दिशेने हा एक महत्त्वाचा उपक्रम असल्याचेही इराणने स्पष्ट केले आहे. (Iran-US-Israel War)

Comments
Add Comment

Metro-3 'Aqua Line' : मेट्रो-३ ‘अॅक्वा लाईन’चा प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार

मुंबई : मुंबईची नवी जीवनवाहिनी ठरणाऱ्या मेट्रो-३ म्हणजेच ‘अॅक्वा लाईन’ने मुंबईकर विद्यार्थी आणि पर्यटकांना एक

Reduce Plastic : तुमचा पहिला टूथब्रश आजही पृथ्वीवर कोठेतरी पडून आहे

प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल: राज्यपाल जिष्णु देव वर्मा देशात दरवर्षी

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास

Smruti Mandhana And Palash muchhal : स्मृती मानधना–पलाश मुच्छल पुन्हा एकत्र? बांद्र्यातील 'त्या' व्हिडिओने चर्चांना उधाण

मुंबई : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या नात्याबाबत पुन्हा एकदा चर्चांना

Ramdas Athawale : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम जिष्णू देव वर्मा यांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय

Bhondubaba Ashok Kharat : भोंदू खरातविरोधात तक्रारींचा महापूर, लैंगिक शोषणाचे आणखी ११ आरोप

मुंबई : वासनांध अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून, तक्रारींची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे.