मुंबई : उन्हाळी सुट्टी सुरु झाली आहे आणि प्रत्येकजण आपल्या गावी किंवा बाहेरगावी जाण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांचा शोध घेत आहेत. आता तिथे जाण्यासाठी सरकारी सुविधांचा वापर म्हणजे ST, रेल्वे यांचा वापर केला जाणारच. पण ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीवेळीच राज्य परिवहन मंडळाने ST भाडे वाढवले आहे.
भाडेवाढीमागील कारणे
उन्हाळी सुट्टीत प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. ग्रामीण भागात जाणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने ST सेवेला मोठी मागणी असते. या पार्श्वभूमीवर हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार ST महामंडळाला असून, त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
किती टक्के वाढ?
स्वच्छता अधिभाराची अंमलबजावणी
ST स्थानके, बसगाड्या आणि आगार स्वच्छ ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याने प्रत्येक तिकिटावर २ रुपये स्वच्छता अधिभार आकारला जाणार आहे.
सवलतधारक आणि पासधारकांसाठीही अधिभार लागू
महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिक आणि इतर सवलतधारक प्रवाशांनाही हा स्वच्छता अधिभार लागू असेल. त्यामुळे सर्व प्रवाशांवर या वाढीचा परिणाम होणार आहे. ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेअंतर्गत चार आणि सात दिवसांच्या पासवर ५ रुपये अधिभार आकारला जाणार आहे. मात्र आगाऊ आरक्षणातून घेतलेल्या पासवर हा अधिभार लागू नसेल. तसेच बस भाड्याने घेणाऱ्यांना प्रति बस ५० रुपये अधिभार द्यावा लागणार आहे.
प्रमुख मार्गांवरील नवे दर
भाडेवाढीनंतर काही महत्त्वाच्या मार्गांवरील तिकिट दर पुढीलप्रमाणे असतील:
परळ ते कोल्हापूर - ६४० ऐवजी आता ७०४ रुपये
मुंबई ते कोल्हापूर - ७५० ऐवजी आता ८२५ रुपये
मुंबई ते लातूर - ९०० ऐवजी १००० रुपये
मुंबई ते रत्नागिरी - ६०० ऐवजी ७०० रुपये तिकीट दर असणार आहे.
मुंबई ते पुणे - २८२ ऐवजी ३१४ तिकीट दर
मुंबई ते नाशिक - ३२३ ते ३५९ रुपये
मुंबई ते अलिबाग - १८२ ऐवजी २०४ रुपये
मुंबई ते चिपळूण - ४५३ ऐवजी ५०२ रुपये
एकूणच, उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात वाढलेली प्रवासी संख्या लक्षात घेता ST ने हा निर्णय घेतला असला, तरी या भाडेवाढीमुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे.