प्रत्येक उद्यानांमध्ये बोअरवेल खोदण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुंबई : मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात येणाऱ्या सर्व उद्यानांमध्ये कुपनलिका (बोरवेलची) खोदण्याची मागणी केली जात आहे. मुंबईतील भविष्यातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर ही मागणी आता जोर धरु लागली आहे. उद्यानांच्या दैनंदिन देखभालीसाठी पुरेशा पाणी पुरवठयाची कायमस्वरुपी स्त्रोत म्हणून या विहिरींचे बांधकाम केले जावे अशी मागणी होत आहे.


मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ सईदा खान यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे ही मागणी केलीआहे. आपल्या ठरावाच्या सूचनेमध्ये त्यांनी मुंबई महानगरपालिकेची जी जी उद्याने आहेत, हया उद्यानात सकाळ-संध्याकाळ नागरिक चालण्यासाठी येतात, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा कट्ट्यावर बसण्यासाठी येतात व लहान मुलेही खेळण्यासाठी येतात. शाळांना सुट्टया पडल्या की सदर उद्यानांमध्ये जास्त गर्दी पहावयास मिळते,असे नमुद केले.


उद्यानांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय तसेच उद्यानांमधील हिरवळ (गवत) व शोभेची झाडे, वेली वर्षभर विशेषतः उन्हाळयात टवटवीत ठेवण्यासाठी नियमित आणि पुरेशा दररोज हजारो लिटर पाणीपुरवठयाची गरज असते. परंतु शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा मूळातच मर्यादित असतो किंवा अनेकदा पाणीपुरवठयात कपातही केली जाते. तसेच, टँकरद्वारे पाणी मागवणे महापालिकेसाठी खर्चिक बाब आहे. त्यामुळे उद्यानाचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी व वृक्षसंपदेचे जतन करण्यासाठी कूपनलिका (बोअरवेल) ही आजच्या काळातील एक अनिवार्य गरज बनली आहे. त्यामुळे हिरवळीच्या शाश्वत संगोपनाचा एक महत्वाचा भाग म्हणून मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात येणाऱ्या सर्व उद्यानांमध्ये कुपनलिका (बोरवेलची) खोदण्याची मागणी डॉ सईदा खान यांनी केली आहे.

Comments
Add Comment

रस्ते विकासाच्या कामांबाबत मनसेच्या किल्लेदारांचा स्थायी समिती अध्यक्षांना सवाल

अर्थसंकल्पावरील भाषणात घेतला समाचार मुंबई : मुंबईतील अनेक रस्त्यांच्या कामांच्या विकासाची कामे

गोरेगाव संतोषनगरमध्ये दोन गटात हाणामारी,महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर चालवला गेला 'बुलडोझर'

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील संतोषनगर परिसरात रविवारी घडलेल्या हिंदू आणि मुस्लिम गटांतील हाणामारीच्या घटनेनंतर

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात ८ एप्रिलपासून बदल; लाईन ९ व २ बी सेवेत, प्रवाशांसाठी अधिक सुलभ व जलद सेवा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास