मुंबई–पुणे एक्सप्रेसवे होणार १० पदरी; टोल वसुली....

२०६० पर्यंत टोल वसुली सुरूच 


मुंबई : वाढत्या वाहतुकीमुळे कायम कोंडीचा सामना करणाऱ्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवे वर आता मोठा बदल होणार आहे. मागेच घाटात एक प्रोपोलिन गॅस ने भरलेला टेम्पो उलटला होता त्यामुळे प्रचंड ट्रॅफिक झाले आणि नागरिकांना तिकडेच २ दिवस अडकून राहावे लागले. अनेक पर्यायी मार्गांचा शोध घेत नागरिकांनी आपली सुटका करून घेतली, अशी परिस्थिती पुन्हा उदभवू नये म्हणून सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. महामार्गाचे १० पदरीकरण करण्याचा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) घेतला असून, यामुळे प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे.



प्रकल्पाला लवकरच गती


मिळालेल्या माहितीनुसार, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम येत्या पावसाळ्यानंतर सुरू होणार आहे. टप्प्याटप्प्याने काम पूर्ण करत पुढील ३ वर्षांत, म्हणजेच २०२९-३० पर्यंत संपूर्ण विस्तार पूर्ण करण्याचे उदिष्ठ आहे. सध्या असलेल्या मार्गावर वाढत्या वाहनसंख्येमुळे निर्माण होणारी कोंडी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.



टोल वसुलीचा कालावधी वाढणार


या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर निधी लागणार असून, तो वित्तीय संस्थांकडून कर्जाच्या माध्यमातून उभारला जाणार आहे. या कर्जाची परतफेड करण्यासाठी सध्याच्या टोल वसुलीची मुदत १५ वर्षांनी वाढवण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे आता या मार्गावर टोल वसुली २०४५ ऐवजी २०६० पर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे.



मिसिंग लिंक प्रकल्पही निर्णायक


दरम्यान, एक्सप्रेसवेवरील महत्त्वाचा १३ किमीचा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास घाटातील वळणे आणि अपघातप्रवण भाग टाळून प्रवास अधिक सुरक्षित आणि जलद होणार आहे. शिवाय मुंबई–पुणे अंतर कमी होऊन वेळेची बचत होईल.



वाहतुकीवर परिणाम टाळण्याचा प्रयत्न


विस्तारीकरणाचे काम सुरू असताना वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने काम करून प्रवाशांना कमीत कमी अडचण येईल, याची काळजी MSRDC कडून घेतली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.


एकीकडे १० पदरीकरण दुसरीकडे टोल वसुलीचा कालावधी वाढणार असला, तरी मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई–पुणे प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. भविष्यातील वाहतूक लक्षात घेता हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Comments
Add Comment

Mumbai: तुमचा वर्षाचा पगार नाही एवढी मोठी लाच, मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या..

मुंबई: राज्याचं प्रशासन सेवेतलं सर्वोच्च स्थान, केंद्रबिंदु असलेल्या मंत्रालयात काही दिवसांपूर्वी एका

रस्ते तसेच रेल्वे कन्व्हर्टची सफाई रिमोट कंट्रोल मशिन्सद्वारे

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने रस्ते आणि रेल्वे कल्व्हर्ट यांच्या सफाईसाठी रिमोट कंट्रोल स्वींग लोडर मशीनचा

BMC : मुंबईसाठी तब्बल १३,५०० मोठ्या आकाराच्या कचरा पेट्यांची खरेदी

सार्वजनिक कचरा पेट्यांची संख्या कमी करताना या ठेवणार कुठे? मुंबई : मुंबईतील मोठ्या आकाराच्या कचरा कुंड्या हटवून

Navi Mumbai: नवी मुंबईतील भोंदूची विकृती उघड; काळी जादू करण्यासाठी महिलांना विवस्त्र व्हायला सांगत...

नवी मुंबई: राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. अशातच आता नवी मुंबईतून अशीच एक धक्कादायक

Ashok Kharat Case : भोंदूबाबा प्रकरणातील स्त्रिया मानसिक धक्क्यात; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे.....

मुंबई : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता अधिक गंभीर वळण घेतले आहे, भोंदूबाबा सोबतचे

मिठी नदी, नालेसफाईच्या कामांबाबत गैरप्रकार झाल्यास थेट कारवाई; महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिला इशारा

मुंबई: नालेसफाईच्या संपूर्ण प्रक्रियेवर अभियंत्यांचे वैयक्तिक लक्ष असणे आवश्यक आहे. तसेच नालेसफाईच्या