रस्ते तसेच रेल्वे कन्व्हर्टची सफाई रिमोट कंट्रोल मशिन्सद्वारे

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने रस्ते आणि रेल्वे कल्व्हर्ट यांच्या सफाईसाठी रिमोट कंट्रोल स्वींग लोडर मशीनचा वापर करण्यात येणार आहे. ही मशीन कॉम्पॅक्ट असून नाल्याच्या बाहेरुन ऑपरेट केली जावू शकते आणि नाल्यातील माती, दगड तसेच लाकूड यासारख्या मोठ्याप्रमाणात कचरा याद्वारे बाहेर काढता येवू शकतो.


मुंबई शहर व उपनगरात पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याकरीता पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे याची सफाई करण्यासाठी विविध प्रकारची वाहनरुद्ध मशीन्स आहेत. ज्यांचा वापर शहरातील ९ आणि १५ उपनगरीय वॉर्डामध्ये मॅनहोल, पाण्याचे प्रवेशद्वार साफ करण्यासाठी तथा गाळ काढण्यासाठी केला जात आहे.


परंतु मुंबई शहर व उपनगरामध्ये रस्ते आणि रेल्वे कल्व्हर्ट्स आहेत. अशा रस्ते आणि रेल्वे कल्व्हर्टची साफसफाई तथा गाळ काढण्यासाठी विशेष यंत्रसामग्रीची आवश्यकता होती. या रस्ते आणि रेल्वे ट्रॅकच्या खाली कल्व्हर्ट बंदिस्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गाळ आणि कचरा तिथे साचतो. पण या विभागाकडे उपलब्ध असलेल्या वाहनांवर बसवलेल्या वाहनरुढ मशिन्सच्या सहाय्याने तेथील गाळ काढणे शक्य होत नाही. त्यामुळे पर्जन्य जलवाहिनी विभागाने सन २०१९ मध्ये रिमोट कंट्रोल्ड स्विंग लोडर मशीन खरेदी केली होती आणि त्यांच्या देखभाल दुरुस्तीचेकाम कंत्राटदाराला तीन वर्षांसाठी देण्यात आले होते. मात्र, याबाबतचे कंत्राट संपुष्टाता आल्याने आता नव्याने देखभाल व दुरुस्तीसाठी कंत्राटदाराची निवड करण्यात येत आहे.


मुंबई महापालिकेच्या अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी ही महापालिका प्रशासनाला या २४ मशिन्सच्या देखभालीसाठी नव्याने तीन वर्षांकरता नेमणूक करण्याचा निर्णय घ्यावा लागला. या साठी तीन वर्षांकरता सुमारे अडीच कोटी रुपये खर्च केले आहेत. यासाठी एच ई सी एन्व्हारो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील