संगमनेर रोडवरील मॉडर्न चायनीज दुकानावर दगडफेक; पाण्याच्या बाटलीच्या पैशांवरून वाद

श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरातील संगमनेर रोड परिसरात महाराष्ट्र वाईनच्या समोरील मॉडर्न चायनीज दुकानावर किरकोळ कारणावरून दगडफेक झाली आणि तोडफोड करण्यात आली. हनुमान जयंती निमित्त काढण्यात आलेली मिरवणूक संपल्यानंतर ही घटना घडली. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दुकानात पाण्याच्या बाटलीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून वाद झाला. या किरकोळ वादाचा राग मनात धरून एका व्यक्तीने आपल्या १५ ते २० साथीदारांसह दुकानावर हल्ला चढवला. यावेळी दुकानासमोरील काऊंटरची काच फोडण्यात आली तसेच खुर्च्या, प्लेट्स यांची तोडफोड करण्यात आली. दुकानातील मालाची नासधूस करून नुकसान करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी सांगितले की, ही घटना पाण्याच्या बाटलीच्या किमतीवरून झालेल्या वादातून घडली असून यामागे कोणताही पूर्वीचा वाद नाही. तसेच या घटनेला जातीय किंवा धार्मिक रंग देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण 

येत्या 26 जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र   मुंबई (विशेष प्रतिनिधी ) उच्‍च

Boat Accidents Maharashtra : गोंदियात भीषण दुर्घटना; बोट उलटल्याने २ तरुणांचा बुडून मृत्यू

गोंदिया : महाराष्ट्रात बीड, खेड आणि गोंदिया येथे पाण्यात बुडाल्याने सात जणांचा मृत्यू झाला. यामध्ये गोंदिया

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; १५ जिल्ह्यांना येलो अलर्ट

मुंबई : राज्यात मान्सून (Monsoon) हळूहळू सक्रिय होत असून गुरुवारी (१२ जून) अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain) आणि

Chandrashekar Bawankule : गगनचुंबी टॉवर व झोपडपट्टीसाठी आता स्वतंत्र रेडी रेकनर

 महसूल मंत्री बावनकुळे यांची घोषणा; मुंबईत 'मायक्रो झोनिंग' सर्वेक्षण सुरू मुंबई : एकाच परिसरात गगनचुंबी टॉवर आणि

सव्वा महिन्याच्या संसाराचा हृदयद्रावक शेवट, पोटाला दगड बांधला अन्…

Yavatmal News : यवतमाळमध्ये प्रेमविवाह केलेल्या नवविवाहित जोडप्याचा हृदयद्रावक शेवट झाला आहे. पोटाला दगड बांधून दोघांनी

Agriculture Minister Dattatreya Bharne : वादळी वाऱ्यामुळे बाधित फळपिकांचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करा; शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

मुंबई : राज्यातील मे व जून २०२६ या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या