निवडणूक आयोगाला पाठवलेल्या ‘त्या' पत्रावरून राष्ट्रवादीत ठिणगी?

मुंबई : दिवंगत नेते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अंतर्गत वादाचे वारे वाहू लागले असून, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि आमदार शिवाजीराव गर्जे यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या एका पत्रात ज्येष्ठ नेत्यांच्या पदांचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याचा ठपका ठेवत तटकरे यांनी गर्जे यांना झापल्याचे समजते.


अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वीकारली. पक्षाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर १० मार्च रोजी त्यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवले होते. या पत्रात सुनेत्रा पवार यांच्या नावासमोर 'अध्यक्षा' आणि शिवाजीराव गर्जे यांच्या नावासमोर 'खजिनदार' असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. मात्र, याच पत्रात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या नावांचा उल्लेख असताना त्यांच्या पदांचा उल्लेख करण्यात आला नव्हता. हे पत्र कार्यालयीन जबाबदारी सांभाळणारे शिवाजीराव गर्जे यांनीच तयार केल्याचे समोर आल्यानंतर तटकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


नेमका वाद काय? : २६ फेब्रुवारी रोजी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीतील कागदपत्रांमध्ये केवळ 'राष्ट्रीय अध्यक्ष' आणि 'कोषाध्यक्ष' या दोनच पदांचा उल्लेख करण्यात आला होता. याच तांत्रिक मुद्द्यावरून तटकरे आणि गर्जे यांच्यात वादाची ठिणगी पडली. पक्षातील सर्वोच्च नेत्यांची पदे डावलल्याने तटकरे नाराज असल्याचे बोलले जात आहे.

Comments
Add Comment

Operation Antim Prahaar अंतर्गत ८ नक्षलवाद्यांना अटक, गडचिरोली जिल्हा अखेर नक्षलमुक्त

गडचिरोली : नक्षलवादी चळवळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या 'ऑपरेशन अंतिम प्रहार' या

NCP : पटेल, तटकरे पदावर कायम, राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच निवडणूक आयोगाला नवीन पत्र पाठवणार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत बदलांबाबत सुरू असलेल्या मोठ्या राजकीय चर्चांना पूर्णविराम

Rain Update : वेळेआधीच मान्सून अंदमानात, महाराष्ट्रात २ ते ५ जून दरम्यान पावसाच्या आगमनाचा अंदाज

मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा 'अल निनो'चे

Weather Alert : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेची लाट

मुंबई : राज्यात सध्या एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे कडाक्याचे ऊन अशी दुहेरी हवामान स्थिती पाहायला मिळत आहे. याच

Modi : सध्याचे दशक अनिश्चितता, जागतिक संकटाचे

नेदरलँड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आपल्या नेदरलँड्स दौऱ्यादरम्यान द हेग येथे भारतीय समुदायाला

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा