निवडणूक आयोगाला पाठवलेल्या ‘त्या' पत्रावरून राष्ट्रवादीत ठिणगी?

मुंबई : दिवंगत नेते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अंतर्गत वादाचे वारे वाहू लागले असून, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि आमदार शिवाजीराव गर्जे यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या एका पत्रात ज्येष्ठ नेत्यांच्या पदांचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याचा ठपका ठेवत तटकरे यांनी गर्जे यांना झापल्याचे समजते.


अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वीकारली. पक्षाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर १० मार्च रोजी त्यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवले होते. या पत्रात सुनेत्रा पवार यांच्या नावासमोर 'अध्यक्षा' आणि शिवाजीराव गर्जे यांच्या नावासमोर 'खजिनदार' असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. मात्र, याच पत्रात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या नावांचा उल्लेख असताना त्यांच्या पदांचा उल्लेख करण्यात आला नव्हता. हे पत्र कार्यालयीन जबाबदारी सांभाळणारे शिवाजीराव गर्जे यांनीच तयार केल्याचे समोर आल्यानंतर तटकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


नेमका वाद काय? : २६ फेब्रुवारी रोजी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीतील कागदपत्रांमध्ये केवळ 'राष्ट्रीय अध्यक्ष' आणि 'कोषाध्यक्ष' या दोनच पदांचा उल्लेख करण्यात आला होता. याच तांत्रिक मुद्द्यावरून तटकरे आणि गर्जे यांच्यात वादाची ठिणगी पडली. पक्षातील सर्वोच्च नेत्यांची पदे डावलल्याने तटकरे नाराज असल्याचे बोलले जात आहे.

Comments
Add Comment

BMC News : जन्म व मृत्यूशी संबंधित विविध अर्जांची नोंद आता स्वतंत्र संगणकात; जुने जन्म / मृत्यू प्रमाणपत्र नवीन क्युआर कोडयुक्त प्रमाणपत्र

स्वतंत्र खिडकीद्वारे स्वीकारणार अर्ज https://prahaar.in/2026/08/06/residents-of-worli-prabhadevi-and-lower-parel-will-face-garbage-related-issues-for-3-to-4-days/ मुंबई (विशेष प्रतिनिधी) :

Water Supply Cut News : वांद्रे पूर्व ते अंधेरी पूर्व भागांत येत्या मंगळवार, बुधवार पाणीकपात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) अंधेरी पूर्व ते वांद्रे पूर्व के दक्षिण आणि एच पूर्व विभागातील पाणीपुरवठा

Best Budget Bike : दिखाऊपणा कशाला? ७० किमी मायलेज आणि ५५ हजारांपासून किंमत; बजेटमधील ५ सर्वोत्तम बाईक!

सध्याच्या काळात महागाई आणि सतत वाढणारे इंधनाचे दर यामुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीय नागरि

BMC News : वरळी, प्रभादेवी आणि लोअर परळ मधील नागरिकांना ३ ते ४ दिवस कचऱ्याची राहणार समस्या

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ प्रशासकीय विभागात कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी

Panchkula Murder Case : पंचकुलात खळबळ! मोलकरणीनेच केली रिटायर्ड कॅप्टनच्या पत्नीची हत्या; सीसीटीव्हीमुळे बिंग फुटले

Haryana : हरियाणामधील पंचकुला येथे घडलेल्या एका थरारक आणि खळबळजनक हत्याप्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

Eknath Shinde : 'शिवसेना कोणाची?' जनतेनेच दिला कौल; ४० चे ६० आमदार करून जनतेने शिक्कामोर्तब केलं

मुंबई : शिवसेना पक्षाच्या मालकीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)