नवी मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय ५८ वर्षेच

शासनाने फेटाळला निवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याचा प्रस्ताव


नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सेवा निवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय आता ५८ वर्षेच कायम राहणार असून, या निर्णयामुळे प्रशासन आणि कर्मचारी वर्गाला मोठा धक्का बसला आहे.


महापालिकेच्या स्थायी समितीने नव्याने तयार केलेल्या सेवा विनियमात निवृत्ती वय ६० वर्षे करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव २० मार्च रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत बहुमताने मंजूर करण्यात आला होता. मात्र, या प्रस्तावावर प्रशासनाने त्यावेळी स्पष्ट भूमिका घेतली नव्हती.


दरम्यान, या प्रस्तावासाठी राज्य शासनाची पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नसल्याचे तसेच तयार करण्यात आलेले सेवा विनियम विद्यमान कायदे व शासन नियमांशी विसंगत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर महापालिका प्रशासनाने शासनाकडे मार्गदर्शन मागितले होते. त्यानुसार नगरविकास विभागाने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील तरतुदींचा आधार घेत हा ठराव प्रथमदर्शनी निलंबित केला आहे.


प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र शासनाच्या या निर्णयामुळे त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. येत्या सहा महिन्यांत मोठ्या संख्येने कर्मचारी सेवानिवृत्त होणार असल्याने प्रशासनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


दरम्यान, हा प्रस्ताव सभागृह नेते सागर नाईक यांनी मांडला होता. प्रस्ताव फेटाळल्यामुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्ष ला राजकीय धक्का बसल्याची चर्चा आहे. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना सागर नाईक यांनी, “या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावू,” असा इशारा दिला आहे. या घडामोडींमुळे नवी मुंबईतील राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसत आहेत.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

Drugs Case : मीरा रोडमध्ये २३.३ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, तिघांना अटक

मीरा रोड : मुंबईलगतच्या मीरा-भाईंदर शहरात पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या कारवाईत एकूण तेवीस लाख तीस

MODI : पंतप्रधान मोदींचा सोमवारी आणि मंगळवारी सिक्कीम तर बुधवारी आणि गुरुवारी उत्तर प्रदेशचा दौरा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोमवारी २७ आणि मंगळवार २८ एप्रिल असा दोन दिवसांचा सिक्कीम दौरा तसेच

PM MODI : 'आजच्या जागतिक तणावाच्या काळात बुद्धांचे विचार अधिक महत्त्वाचे'

नवी दिल्ली : बुद्धांचा संदेश केवळ भूतकाळ नाही, तो आजही प्रासंगिक आहे आणि भविष्यासाठीही आवश्यक आहे. बुद्ध

Karnataka : पादचारी पूल कोसळला, आठ जखमी

मंगळुरू : कर्नाटकमध्ये दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबिद्री तालुक्यात एक अरुंद पादचारी पूल कोसळला. या

Lungi Ngidi : लुंगी एनगिडीला रुग्णालयातून डिस्चार्ज, चाहत्यांचे मानले आभार

नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आपली पहिली