जळगावच्या सुवर्ण बाजारात सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण

जळगाव : एकीकडे आखाती देशांमधील युद्धामुळे एलपीजी, पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढत असताना दुसरीकडे सोन्याच्या दरावर मात्र वेगळाच परिणाम होताना दिसत आहे. इराण-अमेरिका युद्धामुळे सोने-चांदीचे दर घसरले आहेत.जळगावच्या सुवर्णबाजारात दोन्ही धातूंच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गुरुवारी २१६३ रुपयांची घट झाल्यानंतर आज शुक्रवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर पुन्हा २५७५ रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ५१ हजार २०४ रुपयांपर्यंत घसरले जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गुरुवारी दिवसभरात ६१८० रुपयांची घट झाल्यानंतर आज शुक्रवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर आणखी ६१८० रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ४१ हजार २० रुपयांपर्यंत घसरलेआखाती देशांमधील या युद्धांमुळे सोन्याचे दर आतापर्यंत १२४८९ रुपयांची घसरण झाली आहे. तर युद्धाच्या कालावधी चांदीचे दर ४०,००० रुपयांनी घसरले आहेत. दरम्यान, जागतिक पातळीवर तणाव असला तरीही सोने-चांदीची मागणी वाढताना दिसत आहे. ही गुंतवणूक सुरक्षित असल्याने अनेक लोक सोने-चांदी खऱेदी करताना दिसत आहेत.
Comments
Add Comment

CINTAA : रणवीर सिंग-फरहान अख्तर वादावर CINTAA अध्यक्ष पूनम ढिल्लों यांची स्पष्टोक्ती; 'कलाकारांना कामगार म्हणून अधिकृत मान्यता मिळवणे हेच आमचे ध्येय'

NAVI MUMBAI : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि फरहान अख्तर यांच्यातील अलीकडील वादाच्या पार्श्वभूमीवर CINTAA च्या अध्यक्षा

Ind vs Afg : अफगाणिस्तानविरुद्ध धावांचा डोंगर रचत भारताने डाव घोषीत केला

न्यू चंदिगड : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी अफगाण गोलंदाजांची धुलाई

Chhatrapati Shivaji Maharaj Statue in Israel : इस्रायलमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

नवी दिल्ली : भारत आणि इस्रायल यांच्यातील सांस्कृतिक आणि राजनैतिक संबंधांना लवकरच नवी बळकटी मिळणार आहे.

Tajinder Singh Tiwana : प्रभाग क्रमांक ४७ मध्ये अत्याधुनिक “२४ तास मान्सून डिझास्टर कंट्रोल रूम” सुरू

मुंबई : पाणी साचणे, वाहतूक कोंडी, झाडे कोसळणे तसेच इतर आपत्कालीन परिस्थितींमध्ये नागरिकांना तात्काळ मदत उपलब्ध

Maharashtra : शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी, मान्सून कोकणात पोहोचला तरी...

मुंबई : मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत

MPSC EXAM : MPSC परीक्षार्थींसाठी महत्त्वाचे! आता परीक्षा केंद्रावर दीड तास आधी पोहोचणे अनिवार्य; नवीन नियमावली जाहीर

NAGPUR: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या शिस्तपालनासाठी आयोगाने कडक पावले उचलली