मार्चमध्ये युपीआयमधून नागरिकांनी केले कोटींचे व्यवहार; युपीआय ठरतोय वरदान

मुंबई : भारताने सुरु केलेली यूपीआय ही डिजिटल प्रणाली आज जगभर पोहोचली आहे. हातात कॅश नसेल तर आता घाबरून न जात आपण बिनधास्तपणे डिजिटल प्रणाली वापरत आहोत. अगदी किराणा मालापासून ते लाखोंचे व्यवहार करण्यापर्यंत युपीआय वापरले जाते आहे. सणासुदीच्या काळात तर या व्यवहारांत अधिक भर पडते.


प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार मागच्या मार्च महिन्यात युपीआयने पेमेंट करणाऱ्यांची संख्या ही कोटींपर्यंत पोहोचली आहे. आणि एकट्या मार्च महिन्यात २२.६४ अब्ज असे विक्रमी संख्येने व्यवहार पार पडले आहेत. मार्च २०२५ महिन्याची तुलना करता, मार्च २०२६ मध्ये या व्यवहारांमध्ये १९ टक्के वाढ नोंदवली गेली आहे. तसेच फेब्रुवारीत एकूण २६.८४ लाख रुपये इतके व्यवहार झाले असून मार्च महिन्यात त्यात १० टक्क्यांनी वाढले आहेत.



मार्च महिन्यातील सण


मार्च महिन्यात होळी, धूलिवंदन, रंगपंचमी, गुढीपाडवा, ईद असे अनेक सण तसेच देवतांच्या यात्रा - जत्रा, उत्सव असतात. या निमित्ताने देशात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खरेदी होते. या खरेदीसाठी यूपीआयचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. दररोज सरासरी ७३ कोटी व्यवहार झाले आहेत असे निदर्शनास आले. ज्यांचे दैनिक मूल्य हे ९५,२४३ कोटी रुपये इतके आहे.


आजच्या काळात भारतात डिजिटल पेमेंट्सवर जास्त भर दिला जात आहे. एकूण डिजिटल व्यवहारांपैकी जवळपास ८५ टक्के व्यवहार हे पूर्णपणे युपीआयच्या आधाराने केले जातात.

Comments
Add Comment

इस्लामाबाद चर्चा अनिर्णित, इराणचे परराष्ट्रमंत्री चर्चा न करताच परतले, अमेरिकेचा पाकिस्तान दौरा रद्द

इस्लामाबाद : अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणवर हवाई हल्ले सुरू केले आणि पश्चिम आशियात

Punjab Kings : पंजाबचा दिल्ली विरुद्धच्या सामन्यात ऐतिहासिक विजय, सर्वात मोठ्या धावसंख्येचा केला यशस्वी पाठलाग

नवी दिल्ली : पंजाब किंग्सने शनिवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ६ गडी राखून विजय मिळवत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात

Toll Exemption : सिंधुदुर्गवासियांना ‘टोल माफ’, पालकमंत्री नितेश राणेंनी दिला दिलासा

सावंतवाडी : ओसरगाव टोल नाक्यावर मी आमदार असताना सिंधुदुर्ग जिल्हावासियांना टोल लागू दिला नव्हता. आता महामार्ग

Blast : अखिलेश यादव, राहुल गांधींचा पुतळा जाळताना स्फोट, भाजप महिला आमदार जखमी

बहराइच : उत्तर प्रदेशच्या बहराइचमध्ये भाजपाच्या 'महिला जनआक्रोश मोर्चा' दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे.

Chitra Wagh : 'कितीही विरोध झाला तरी भाजपा महिलांना आरक्षण मिळवून देणारच'

मुंबई : महिला आरक्षणाला विरोध करून लाखो महिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर करणाऱ्या विरोधी पक्षांना या लाखो

पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात ९३ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या २९४ जागांपैकी १५२ जागांसाठी पहिल्या टप्प्यात २३ एप्रिल २०२६ रोजी