विधानपरिषदेच्या ४ जागांसाठी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी

मुंबई : विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांवर संधी मिळावी, यासाठी भाजपमध्ये इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यंदा १३ मे रोजी रिक्त होणाऱ्या ९ पैकी ४ जागा भाजपच्या वाट्याला येणार आहेत. अशावेळी राज्यसभा निवडणुकीत संधी न मिळालेल्या नेत्यांनी आता आपले संपूर्ण लक्ष विधान परिषदेवर केंद्रित केले असून उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे धाव घेतल्याचे समजते.


विधान परिषदेच्या ९ सदस्यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपुष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर, एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. भाजपात असलेल्या इच्छुकांच्या लांबलचक यादीमुळे उमेदवारी कोणाला द्यायची, असा पेच पक्ष नेतृत्वासमोर निर्माण झाला आहे.


भाजपचे रणजीतसिंह मोहिते-पाटील, संदीप जोशी, दादाराव केचे आणि संजय केणेकर या चार सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. पक्षाच्या धोरणानुसार यातील किती जणांना पुन्हा संधी मिळते आणि किती जणांचा पत्ता कट होतो, यावर अनेकांचे भवितव्य अवलंबून आहे. विशेषतः प्रादेशिक समतोल आणि जातीचे समीकरण पाहता पक्ष नव्या चेहऱ्यांना प्राधान्य देणार की जुन्यांनाच कायम ठेवणार, याची उत्सुकता वाढली आहे.


इच्छुकांची यादी : भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र उपाध्यक्ष केशव उपाध्ये, माधवी नाईक यांसारख्या संघटनात्मक नेत्यांसोबतच रणजीतसिंह निंबाळकर आणि राम सातपुते यांची नावे चर्चेत आहेत. याशिवाय, महायुतीच्या जागावाटपामुळे विधानसभेत ज्यांना संधी मिळू शकली नाही, अशा मातब्बर नेत्यांनीही फिल्डिंग लावली आहे. अशावेळी पक्षासाठी वर्षानुवर्षे निष्ठेने काम करणाऱ्यांना संधी द्यायची की निवडणुकीतील गणिते पाहून नवीन उमेदवारांना मैदानात उतरवायचे, यावरून भाजपात सध्या खल सुरू आहे. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात ही निवडणूक प्रक्रिया पार पडण्याची शक्यता असल्याने पुढील काही दिवस भाजपातील 'वेटिंग लिस्ट'मधील नेत्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

Comments
Add Comment

मीरा-भाईंदर क्षेत्रातील रिक्षा परवाने पुनर्तपासणीचे आदेश

मुंबई : मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रिक्षा परवाने व बॅच वितरणाची संपूर्ण पुनर्तपासणी करून १

'मराठी माणसाच्या असंख्य आठवणींचे गाठोडे म्हणजे भारतमाता'

मुंबई : लालबाग, परळ आणि गिरणगावातील असंख्य मराठी माणसाच्या आठवणींचे एक मोठे गाठोडे घेऊन भारतमाता सिनेमागृह उभे

राज्याच्या महसूल विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार ३५ हजार ८७६ पदांसह प्रशासकीय रचनेत मोठे बदल

मुंबई : राज्यातील महसूल प्रशासनातील कामाचा वाढता व्याप आणि नागरिकांना जलद सेवा मिळावी, या उद्देशाने महसूल

Nagpur : नागपूरमध्ये ‘U-17 राष्ट्रीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा

मुंबई : महाराष्ट्राच्या बॉक्सिंग इतिहासात महत्त्वपूर्ण ठरणारी सातवी, १७ वर्षांखालील (अंडर १७) ज्युनिअर

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री शेतक - यांच्या बांधावर

राज्यात अवकाळी पावसामुळे १ लाख २२ हजारहून अधिक हेक्टर शेती पिकांचे नुकसान पुणे : राज्यात वादळी वारा व गारांच्या

उद्योगांना एलपीजीचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील - राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

मुंबई : महाराष्ट्रात कार्यरत असलेली प्रत्येक विदेशी कंपनी ही राज्याचीच आहे, या भूमिकेतून राज्य शासन सर्वतोपरी