राज्यात १० वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : महाराष्ट्राच्या प्रशासनात महत्त्वपूर्ण फेरबदल करत राज्य सरकारने आज, मंगळवारी एकाचवेळी १० वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत. या बदल्यांमध्ये विविध महत्त्वाच्या विभागांतील पदांवर नव्या नियुक्त्या करण्यात आल्या असून, प्रशासनात कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.


यामध्ये विशेष लक्षवेधी बदल म्हणजे अश्विनी भिडे यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती. त्या यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावर कार्यरत होत्या. त्यांच्या जागी १९९३ बॅचचे वरिष्ठ अधिकारी लोकेश चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रा यापूर्वी महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. दरम्यान, भिडे यांच्याकडे मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार कायम ठेवण्यात आला आहे.


मागील सहा महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि हिवाळी अधिवेशनामुळे प्रशासकीय बदल्या रखडल्या होत्या. मात्र मार्च अखेरीस या बदल्या अपेक्षित होत्या. त्यानुसार २८ मार्च रोजी काही बदल्या झाल्यानंतर आज मोठ्या प्रमाणावर फेरबदल जाहीर करण्यात आले.



प्रमुख बदल्या पुढीलप्रमाणे :-


लोकेश चंद्रा (आयएएस १९९३ ) — मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव, मुंबई


अश्विनी भिडे (आयएएस १९९५ ) — आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका


विकास चंद्र रस्तोगी (आयएएस १९९५ ) — अतिरिक्त मुख्य सचिव (वित्तीय सुधारणा), वित्त विभाग


विनिता वैद सिंघल (आयएएस १९९६ ) — प्रधान सचिव, मृद व जलसंधारण विभाग


परिमल सिंग (आयएएस २००४ ) — सचिव (कृषी), कृषी व एडीएफ विभाग


तुकाराम मुंढे (आयएएस २००५ ) — सचिव, आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन विभाग


लहू माळी (आयएएस २००९ ) — व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वासन प्रकल्प लिमिटेड


माणिक गुरसाल (आयएएस S २००९ ) — सचिव, दिव्यांग कल्याण विभाग


प्रेरणा देशभ्रतार (आयएएस २०१०) — आयुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग


पृथ्वीराज बी. पी. (आयएएस २०१४ ) — आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका


या बदल्यांमुळे राज्यातील विविध विभागांमध्ये नवे नेतृत्व निर्माण होणार असून, प्रशासन अधिक गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र