Maharani Tararani : महाराणी ताराराणी जैन समुदायाच्या

आचार्य नयन पद्मसागर यांचे वादग्रस्त विधान; मराठी भाषेची रचना देखील जैन आचार्यने केल्याचा दावा


मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषा, स्वराज्यरक्षक महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या आणि औरंगजेबाचा नाश करण्यासाठीच या 'जैन' महाराणीचा जन्म झाला, असे खळबळजनक विधान आचार्य नयन पद्मसागर यांनी केले आहे. तसेच मराठी भाषेची रचना आणि महाराष्ट्रातील 'पाटील' ही परंपराही जैन धर्माशी निगडित असल्याचा दावा त्यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.


महावीर जयंतीनिमित्त मुंबईत आयोजित एका विशेष कार्यक्रमात आचार्य नयन पद्मसागर बोलत होते. यावेळी त्यांनी इतिहासातील विविध दाखले देत जैन समुदायाचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे करताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्याची धुरा सांभाळणाऱ्या महाराणी ताराराणी यांचा उल्लेख थेट 'जैन महाराणी' असा केला.


आचार्य नयन पद्मसागर म्हणाले की, जेव्हा औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे हाल केले, तेव्हा औरंगजेबाचा नाश करण्यासाठी आणखी एका जैन महाराणीचा जन्म झाला, त्या म्हणजे ताराराणी. केवळ ताराराणीच नव्हे, तर मेवाडच्या राणीचा उल्लेखही त्यांनी जैन असा केला. मराठी भाषेची रचना जैन आचार्यांनी केली आहे. महाराष्ट्रात १ कोटी १२ लाख जैन आहेत. महाराष्ट्रातील 'पाटील', 'चौघुले', 'सरनाईक' ही आडनावे लावणारे सर्व मूळचे जैन धर्म पाळणारे आहेत, असा दावाही त्यांनी केला.

Comments
Add Comment

Nilesh Rane : सिंधुदुर्गमधील घरकुलांसाठी गायरान आणि शासकीय जमिनी देणार

आमदार निलेश राणे यांच्या प्रश्नावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे सकारात्मक उत्तर; नवीन घरकुलांना जमीन

CM Devendra Fadnavis: २०२९-३० पर्यंत महाराष्ट्रातील वीज दर गुजरातपेक्षाही स्वस्त होणार; मुख्यमंत्र्यांचे विधान परिषदेत आश्वासन

वीज यंत्रणा सक्षम होणार, ३ वर्षांत 'डीपी' फेल होणे थांबणार मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पावसाळी

नाशिक TCS धर्मांतर प्रकरणावर विधान परिषदेत चर्चा : मुख्यमंत्र्यांकडून विशेष महिला समितीची घोषणा

मुंबई : राज्यातील बहुराष्ट्रीय आणि आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या उच्चशिक्षित महिलांना लक्ष्य करून त्यांचे

Mumbai Local Train Murder : मुंबई लोकलमध्ये रक्तरंजित थरार! क्षुल्लक कारणावरून २२ वर्षीय तरुणाची चाकूने हत्या

मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी मुंबई लोकल पुन्हा एकदा एका धक्कादायक आणि रक्तरंजित घटनेमुळे

Mumbai Monsoon BMC : मुंबईत मुसळधार पाऊस; महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज, सखल भागांतील पाण्याचा वेगाने निचरा

- मालाड मालवणीत ३४० तर शहरांत परळ भागांत ३३४ मिमी पाऊस मुंबई (विशेष प्रतिनिधी ) मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या

Mumbai Monorail : मुंबई मोनोरेल पुन्हा धावणार! ९ महिन्यांनंतर सेवांना हिरवा कंदील; भाडेवाढीचाही प्रस्ताव

मुंबई : तब्बल ९ महिन्यांच्या खंडानंतर मुंबई मोनोरेल (Mumbai Monorail) सेवा पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.