Maharani Tararani : महाराणी ताराराणी जैन समुदायाच्या

आचार्य नयन पद्मसागर यांचे वादग्रस्त विधान; मराठी भाषेची रचना देखील जैन आचार्यने केल्याचा दावा


मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषा, स्वराज्यरक्षक महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या आणि औरंगजेबाचा नाश करण्यासाठीच या 'जैन' महाराणीचा जन्म झाला, असे खळबळजनक विधान आचार्य नयन पद्मसागर यांनी केले आहे. तसेच मराठी भाषेची रचना आणि महाराष्ट्रातील 'पाटील' ही परंपराही जैन धर्माशी निगडित असल्याचा दावा त्यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.


महावीर जयंतीनिमित्त मुंबईत आयोजित एका विशेष कार्यक्रमात आचार्य नयन पद्मसागर बोलत होते. यावेळी त्यांनी इतिहासातील विविध दाखले देत जैन समुदायाचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे करताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्याची धुरा सांभाळणाऱ्या महाराणी ताराराणी यांचा उल्लेख थेट 'जैन महाराणी' असा केला.


आचार्य नयन पद्मसागर म्हणाले की, जेव्हा औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे हाल केले, तेव्हा औरंगजेबाचा नाश करण्यासाठी आणखी एका जैन महाराणीचा जन्म झाला, त्या म्हणजे ताराराणी. केवळ ताराराणीच नव्हे, तर मेवाडच्या राणीचा उल्लेखही त्यांनी जैन असा केला. मराठी भाषेची रचना जैन आचार्यांनी केली आहे. महाराष्ट्रात १ कोटी १२ लाख जैन आहेत. महाराष्ट्रातील 'पाटील', 'चौघुले', 'सरनाईक' ही आडनावे लावणारे सर्व मूळचे जैन धर्म पाळणारे आहेत, असा दावाही त्यांनी केला.

Comments
Add Comment

BMC सभागृहनेत्यांचा पुन्हा आवाजावरून त्रागा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सभागृहातील ध्वनी यंत्रणेतील दोष निवारण करण्यास अद्यापही

Mumbai : भटक्या श्वानांची नसबंदी करण्यासाठी BMC ने केला ७० हजार कोटींचा खर्च, एमआयएमच्या नगरसेवकाने मारला हवेत बाण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील भटक्या श्वानांची नसबंदी करण्यासाठी संस्थांच्या नेमणुकीला स्थायी समितीने

Mumbai : सायकल ट्रॅक नाही, उद्यानही नाही आणि तरी कोट्यवधींचा देखभालीवर खर्च

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीभोवतीचा विळखा काढून दहा मीटर परिसर मोकळा करण्यात

Mithi नदीचा गाळ काढण्याच्या प्रस्तावांना मंजुरी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मिठी नदीमधील गाळ काढण्याच्या कंत्राट कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर

BMC स्थायी समिती अध्यक्ष करणार मुंबईतील रस्त्यांची पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पावसाळा जवळ आला असून अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे तसेच इतर प्रकल्पांची कामे सुुरु

BMC च्या तक्रारींचे होणार जलद निवारण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकर नागरिकांना नागरी सेवा-सुविधा पुरविताना नागरिकांचा सहभाग वाढवून त्यांच्या