Maharani Tararani : महाराणी ताराराणी जैन समुदायाच्या

आचार्य नयन पद्मसागर यांचे वादग्रस्त विधान; मराठी भाषेची रचना देखील जैन आचार्यने केल्याचा दावा


मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषा, स्वराज्यरक्षक महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या आणि औरंगजेबाचा नाश करण्यासाठीच या 'जैन' महाराणीचा जन्म झाला, असे खळबळजनक विधान आचार्य नयन पद्मसागर यांनी केले आहे. तसेच मराठी भाषेची रचना आणि महाराष्ट्रातील 'पाटील' ही परंपराही जैन धर्माशी निगडित असल्याचा दावा त्यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.


महावीर जयंतीनिमित्त मुंबईत आयोजित एका विशेष कार्यक्रमात आचार्य नयन पद्मसागर बोलत होते. यावेळी त्यांनी इतिहासातील विविध दाखले देत जैन समुदायाचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे करताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्याची धुरा सांभाळणाऱ्या महाराणी ताराराणी यांचा उल्लेख थेट 'जैन महाराणी' असा केला.


आचार्य नयन पद्मसागर म्हणाले की, जेव्हा औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे हाल केले, तेव्हा औरंगजेबाचा नाश करण्यासाठी आणखी एका जैन महाराणीचा जन्म झाला, त्या म्हणजे ताराराणी. केवळ ताराराणीच नव्हे, तर मेवाडच्या राणीचा उल्लेखही त्यांनी जैन असा केला. मराठी भाषेची रचना जैन आचार्यांनी केली आहे. महाराष्ट्रात १ कोटी १२ लाख जैन आहेत. महाराष्ट्रातील 'पाटील', 'चौघुले', 'सरनाईक' ही आडनावे लावणारे सर्व मूळचे जैन धर्म पाळणारे आहेत, असा दावाही त्यांनी केला.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी

Prakash Abitkar : गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’

मुंबई : राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी

Rain In Maharashtra : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा फॉर्मात येणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरात बरसणार ?

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे मोर्चा वळवल्याचे चित्र आहे.

Ashish Shelar : गणेशमूर्ती आगमन मार्गांची २४ तासांत पाहणी; प्रशासकीय कसूर आढळल्यास कारवाई - आशिष शेलार

मुंबई : भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील

Weather Update : महाराष्ट्रात सोमवारी कोण कोणत्या भागात पावसाची शक्यता ?

मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार २४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

मुंबई : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून