नालंदा: बिहारमधील शीतला मंदिरात चेंगराचेंगरी झाली. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. मंगळवारी, नालंदा जिल्ह्यातील दिपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माघरा गावातील शीतला मंदिरात भाविकांची मोठी गर्दी जमली होती. पूजेदरम्यान गर्दी अनियंत्रित झाली आणि चेंगराचेंगरी झाली. घटनेची माहिती मिळताच, दीपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले.
मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
मुख्यमंत्र्यांनी दुःख व्यक्त केले. तसेच मुख्य सचिवांना चौकशी करण्याचे निर्देश दिले आणि नुकसान भरपाईची घोषणाही केली.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. मुख्य सचिवांना चौकशीचे निर्देश देण्यात आले असून, पाटणा आयुक्तांना घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. नुकसान भरपाईची घोषणाही करण्यात आली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्रत्येकी ४ लाख रुपये आणि मुख्यमंत्री मदत निधीतून प्रत्येकी २ लाख रुपये देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय, पीएमएनआरएफतर्फे प्रत्येक मृताच्या कुटुंबाला २ लाख रुपयांची सानुग्रह रक्कमही दिली जाईल.
पंतप्रधान मोदींकडूनही दुःख व्यक्त
पंतप्रधान मोदींनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, "बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील अपघात अत्यंत दुःखद आहे. ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याप्रती मी माझ्या तीव्र संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो." पीएमएनआरएफमधून प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल. जखमींना ५० हजार रुपये दिले जातील.
शीतला मंदिरात ही चेंगराचेंगरी झाली, ते बिहार शरीफमधील नालंदा जिल्ह्यातील माघरा येथे आहे. मंगळवारी, माघरा येथील शीतला मंदिरात हजारो लोक दर्शनासाठी जमले होते. दरवर्षी अशी गर्दी जमते, पण असा अपघात यापूर्वी कधीही घडला नव्हता. पोलीस आता या चेंगराचेंगरीचा आणि त्यामागे काही कट आहे का याचा तपास करत आहेत. मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करणे अशक्य आहे.