Neelam Gorhe : मंत्रिपद मिळवण्यासाठी नीलम गोऱ्हे भोंदूबाबा खरातच्या चरणी!

- सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांचा खळबळजनक आरोप


मुंबई : महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. आता या प्रकरणात आता विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांचे नाव ओढले गेल्याने खळबळ उडाली आहे. "मंत्रिपद मिळवण्यासाठी आणि भविष्य जाणून घेण्यासाठी नीलम गोऱ्हे या खरातच्या संपर्कात होत्या," असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला आहे.


देसाई म्हणाल्या, "नाशिकमधील पाथर्डी फाटा येथील 'एक्स्प्रेस इन' हॉटेलमध्ये नीलम गोऱ्हे वास्तव्यास असताना अशोक खरात त्यांना भेटायला गेला होता. मंत्रिपद कधी मिळेल, हे भविष्य पाहण्यासाठी गोऱ्हे यांनी खरातला बोलावले होते. नाशिकच्या कॉलेज रोडवरील खरातच्या कार्यालयातही त्या गेल्या होत्या." विशेष म्हणजे, या भेटीवेळी गोऱ्हे यांच्यासोबत उपस्थित असलेल्या व्यक्तीनेच ही माहिती दिल्याचा दावाही देसाई यांनी केला आहे.


महिलांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणाऱ्या नीलम गोऱ्हे या प्रकरणावर अद्याप शांत का, असा सवाल देसाई यांनी उपस्थित केला. "शंभरहून अधिक महिलांच्या शोषणाचे व्हिडिओ समोर आले आहेत, पोलीस तपास करत आहेत. अशा वेळी प्रत्येक लहान मुद्द्यावर प्रसिद्धीपत्रक काढणाऱ्या नीलमताईंनी उपसभापती असूनही यावर अवाक्षरही काढले नाही. खरात जरी परिचयाचा असला, तरी त्याचे काळे कारनामे समोर आल्यावर त्यांनी आवाज उठवायला हवा होता," अशी टीका देसाई यांनी केली.

Comments
Add Comment

Dhule News : शिरपूर-चोपडा मार्गावर भीषण अपघात; दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

Dhule News : धुळे जिल्ह्यातुन एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील शिरपूर-चोपडा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात

Vikroli Crime : 'गाणी हळू वाजव' एवढंच बोलला अन्... ; दोन सख्या भावांमध्ये रक्तरंजित खेळ; दोघांचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील विक्रोळी पार्कसाईट परिसरात कौटुंबिक वादातून घडलेल्या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. राहुल

Jalgaon Gold Rate : सोने चांदीचे भाव गगनाला ! जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत मोठी उलथापालथ

Jalgaon Gold Rate : जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत (Jalgaon Gold Market) गेल्या काही दिवसांपासून सोने, चांदीच्या दरात कमी-अधिक फरकाने

Tiranga Rally : भाजप प्रत्येक जिल्ह्यात काढणार 'तिरंगा रॅली'

- ९ ते १७ ऑगस्टदरम्यान आयोजन; १० ऑगस्टला मुंबईत २५ हजार तरुणांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार मुंबई :

Rickshaw-Taxi Driver : 15 ऑगस्टनंतर 'या' रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाईची शक्यता; मुदतवाढ मिळणार नाही

मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान अनिवार्य करण्याच्या निर्णयाची

Ahilyanagar : शेततळ्यात बुडून दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात हळहळ

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात एक मन हेलावणारी घटना घडली आहे. कोपरगाव तालुक्यातील बाहदराबाद