Weather Update : हवामानाचा ‘डबल अटॅक’! मुंबईत उकाड्याचा कहर तर विदर्भात वादळी पावसाचा इशारा

मुंबई : राज्यात हवामानाने अचानक कोंडी केली असून एका बाजूला मुंबई (Mumbai) मध्ये उकाड्याने अक्षरशः घामाच्या धारा सुरू आहेत, तर दुसरीकडे विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.


पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या दिशेने येणाऱ्या वाऱ्यांमुळे देशातील हवामानात मोठा बदल झाला आहे. इस्लामाबादकडून सरकणाऱ्या वाऱ्यांमुळे सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले असून त्याचा परिणाम महाराष्ट्रासह कर्नाटकावर होत आहे. तसेच बंगालच्या उपसागराकडूनही हवामान प्रणाली सक्रिय झाली आहे, तर वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तरेकडून थंड वाऱ्यांचा प्रभाव जाणवत आहे.


यामुळे पुढील काही दिवस राज्यात मिश्र हवामान पाहायला मिळणार आहे. पुढील २४ तासांत किमान तापमानात सुमारे ४ अंशांनी घट, तर कमाल तापमानात ४ अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यानंतर दोन दिवस तापमानात चढ-उतार सुरूच राहतील.


आज विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असून पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक सरी कोसळण्याची शक्यता आहे. २९ मार्च रोजी कोकण वगळता राज्यभर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


३०,३१ मार्च आणि १ एप्रिलदरम्यान राज्यभर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असून IMD ने अलर्ट जारी केला आहे.

Comments
Add Comment

'होय मीच माझ्या पत्नीचा खून केलाय'....; सायको पती मृतदेहासोबत थेट पोलीस ठाण्यात

समृध्दी महामार्गावर पत्नीची हत्या करून आरोपी पती पोहचला थेट पोलीस ठाण्यात वाशिम : समृद्धी महामार्गावर ( Samruddhi Mahamarg)

Dashavatar : दशावतार कलाकार सर्वेक्षणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष नोंदणी मोहीम

- जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात विशेष कक्ष मुंबई : महाराष्ट्राच्या समृद्ध

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड घटनेनुसारच!

- प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे; सच्चिदानंद सिंह यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार मुंबई : राष्ट्रवादी

Farmer Loan Waiver : ऐतिहासिक कर्जमाफीबद्दल 15 जुलैला मुख्यमंत्री फडणवीसांचा शेतकऱ्यांकडून जाहीर सत्कार

मुंबई : राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ देणारी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' लागू

Vadhvan Port News : पॅरिसच्या धर्तीवर वाढवण बंदराजवळ उभारणार आंतरराष्ट्रीय कृषी बाजार

- मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; राज्यातील शेतमाल निर्यातीला मोठी चालना मिळणार मुंबई : पालघर जिल्ह्यात विकसित होत

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणायला तयार!

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; त्यांनी रामरक्षेची किमान दोन पाने तरी स्वतः वाचावीत मुंबई : "उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)