मुंबईतील भूजलात खारटपणा वाढण्याचा धोका

- राष्ट्रीय जलभांडार नकाशांकन व व्यवस्थापन कार्यक्रम अंतर्गत निष्कर्ष


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


पाण्याचे नैसर्गिक स्रोत, भूगर्भातील पाण्याचा साठा, भविष्यासाठी त्याचे नियोजन आणि व्यवस्थापनावर मुंबई महानगरपालिका मुख्यालयात शुक्रवारी २७ मार्च २०२७ रोजी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मुंबई महानगरासाठीचे राष्ट्रीय जलभांडार नकाशांकन व व्यवस्थापन कार्यक्रम अंतर्गत निष्कर्ष मांडले. देशभरात जमिनीखालील पाण्याचे साठे कुठे आहेत, किती आहेत आणि त्यांचा योग्य वापर कसा करायचा याबाबत त्यांनी माहिती दिली. मुंबईच्या शाश्वत विकासासाठी पाण्याचे व्यवस्थापन अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भूगर्भातील पाण्याचा वाढता उपसा नियंत्रणात आणणे, प्रदूषणाचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे असून समुद्रकिनारी भाग असल्याने भूजलातील खारटपणा वाढण्याचा धोका अधिक असल्याचाही निष्कर्ष मांडण्यात आला आहे.


मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी तसेच अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनानुसार ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत महानगरपालिका उप आयुक्त (पर्यावरण व वातावरणीय बदल) अविनाश काटे, उप मुख्य अभियंता अजय राणे यांच्यासह बैठकीस भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, जलसंपदा विभाग तसेच नियोजन विभाग, जल अभियांत्रिकी, पर्यावरण विभागासह विविध विभाग तसेच खासगी जल-पर्यावरण संस्थांचे एकूण ३१ प्रतिनिधी प्रत्यक्ष आणि २५ प्रतिनिधी ऑनलाइन सहभागी झाले.या बैठकीत केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालय अधिनस्थ केंद्रीय भूजल मंडळाचे वरिष्ठ भूजल वैज्ञानिकउपेंद्र धोंडे यांनी भूजलाची माहिती दिली. भूजलाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे आणि तिचा उपयोग कसा करायचा यावर शुक्रवारच्या कार्यशाळेत सविस्तर चर्चा करण्यात आली.


‘केंद्रीय भूजल विभागाचे भूजल माहिती भांडार तसेच जलधर नकाशाकरण अभ्यास प्रकल्पांचे उपयोग’ या विषयावरील या कार्यशाळेत भूजलाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे आणि तिचा उपयोग कसा करायचा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यशाळेत केंद्रीय भूजल मंडळाचे वरिष्ठ भूजल वैज्ञानिक उपेंद्र धोंडे यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे भूजल व्यवस्थापनाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी राष्ट्रीय माहिती प्रसारण धोरण यावर सादरीकरण केले. तसेच मुंबई महानगरासाठीचे राष्ट्रीय जलभांडार नकाशांकन व व्यवस्थापन कार्यक्रम अंतर्गत निष्कर्ष मांडले. देशभरात जमिनीखालील पाण्याचे साठे कुठे आहेत, किती आहेत आणि त्यांचा योग्य वापर कसा करायचा याबाबत त्यांनी माहिती दिली. मुंबईच्या शाश्वत विकासासाठी पाण्याचे व्यवस्थापन अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भूगर्भातील पाण्याचा वाढता उपसा नियंत्रणात आणणे, प्रदूषणाचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे तसेच समुद्रकिनारी भाग असल्याने भूजलातील खारटपणा वाढण्याचा धोका याकडेही त्यांनी लक्ष वेधले.


वरिष्ठ भूजल वैज्ञानिक उपेंद्र धोंडे यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे मुंबईच्या शाश्वत विकासासाठी पाण्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यासोबत भूगर्भात असलेल्या पाण्याचा वाढता उपसा कसा नियंत्रणात आणता येईल, प्रदूषणाचे प्रमाण कसे कमी करता येईल आदींवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. मुंबईचा बहुतांश भाग समुद्र किनाऱ्याचा आहे. येथील भूजलात खारटपणा वाढण्याचा धोका असल्याचेही धोंडे यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या अटल भूजल योजना, जलशक्ती अभियान, जलसंचय जन भागीदारी, मिशन अमृत सरोवर आदी योजनांचीही यावेळी बैठकीत माहिती देण्यात आली.

Comments
Add Comment

अमेरिकेच्या येल विद्यापिठाचा विद्यार्थी करणार मुंबई बंदर, माथाडी कामगार, शहराचा विकासावर पीएचडी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) अमेरिकेच्या येल विद्यापिठाच्या इतिहास विभागातील विद्यार्थी हा , विसाव्या शतकातील

Malad BMC School : मालाड पश्चिममधील अतिधोकादायक नेमाणी शाळेत शिकतात महापालिकेची मुले

- भाजप नगरसेविकेने शिक्षण समितीच्या बैठकीत शाळा बंद करण्याची केली मागणी - पर्यायी शाळा लिबर्टी गार्डन शाळेत सुरु

BMC News : महापालिकेच्या स्टॉल्सचा परवाना अविवाहित व्यक्तीच्या मृत्यूनंतर आई, वडिलांच्या नावे होणार

- भाऊ आणि बहिणीच्या नावे करण्यास प्रशासनाने दर्शवला ठाम नकार मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेचे स्टॉल्स

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं