ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंक

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तिपत्र 


मुंबई : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान आणि तंत्रस्नेही करण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा’ कार्यक्रमात राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अखत्यारीत येणाऱ्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळाने’ (एमएमबी) बाजी मारली आहे. राज्यातील ९७ संस्था आणि मंडळांच्या चुरशीच्या मूल्यमापनात २०० पैकी १९८.७५ असे विक्रमी गुण मिळवून सागरी मंडळाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, डिजिटल परिवर्तनाच्या या शर्यतीत आपला डंका वाजवला आहे.


अलिकडेच या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला होता. शनिवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या संस्था, विभाग आणि अधिकाऱ्यांचा प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा बहुमान स्वीकारला. कागदविरहित प्रशासन, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि नियमबद्ध नागरिक सेवा अशा निकषांवर आधारित या कार्यक्रमात सागरी मंडळाने सर्व प्रवर्गांमध्ये सर्वोच्च कामगिरी नोंदवली आहे.


महाराष्ट्र सागरी मंडळासह अन्य महत्त्वाच्या संस्थांनीही या सुधारणा कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी केली. यामध्ये प्रामुख्याने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण आदी मंडळांचा समावेश आहे. त्यांच्या वतीने अनुक्रमे महेंद्र कल्याणकर, योगेश म्हसे, संजय मुखर्जी, एम. देवेंदर सिंह, संजीव जयस्वाल, पी. वेलरासू, लोकेश चंद्र आणि प्रमोद नाईक यांनी प्रशस्तिपत्रक स्वीकारले



प्रशासकीय अधिकाऱ्यांची चमकदार कामगिरी


मंत्रालयीन विभाग आणि सनदी अधिकाऱ्यांनीही ई-गव्हर्नन्समध्ये चमकदार कामगिरी केली. मंत्रालयीन विभागात मनीषा पाटणकर म्हैसकर (सार्वजनिक बांधकाम), मिलिंद म्हैसकर (वन विभाग), आणि संजय सेठी (परिवहन व बंदरे) यांच्यासह सात विभागांना गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी आणि छत्रपती संभाजीनगरचे जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकाऱ्यांमध्ये रोहन घुगे (जळगाव), श्रीकृष्ण पांचाळ (ठाणे) आणि वर्षा ठाकूर-घुगे (लातूर) यांच्यासह पाच जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव झाला. पोलीस परिक्षेत्रात शहाजी उमाप (नांदेड) आणि संदीप पाटील (नागपूर) यांनी उत्कृष्ट काम केले. तर ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, नागपूर ग्रामीणचे हर्ष पोद्दार आणि रत्नागिरीचे नितीन बगाटे यांनीही ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये चमकदार कामगिरी केली.

Comments
Add Comment

BMC Waste Management : मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती: महानगरपालिकेकडे नोंदणी न करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

मुंबई : घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था व व्यक्तींनी

BMC News : एकही मॅनहोल्स उघडे राहता कामा नये

महापालिका आयुक्तांनी दिले संबंधित खात्यांसह सहायक आयुक्तांनाही निर्देश मुंबई : सध्या सुरू असलेली सर्व

Devendra Fadnavis : कला, संस्कृती अन् खाद्यसंस्कृतीची ओळख पटवून देणारा 'माटी ९ पूर्वांचल महोत्सव' : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय संस्कृती महान असून ही संस्कृती समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्राने anj पूर्वांचलने महत्त्वपूर्ण

Rain Update : वेळेआधीच मान्सून अंदमानात, महाराष्ट्रात २ ते ५ जून दरम्यान पावसाच्या आगमनाचा अंदाज

मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा 'अल निनो'चे

Weather Alert : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेची लाट

मुंबई : राज्यात सध्या एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे कडाक्याचे ऊन अशी दुहेरी हवामान स्थिती पाहायला मिळत आहे. याच

मुलुंड कालिदास नाट्य गृह परिसरातील टर्फसह अनधिकृतरित्या बांधकामांवर कारवाई

महापौरांचे आदेश आणि दुसऱ्याच दिवशी कारवाईला सुरुवात मुंबई :मुलुंड येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा