उन्हाळ्यात कोल्डड्रिंक्सऐवजी 'या' आरोग्यवर्धक पदार्थाचं सेवन करा, जाणून घ्या फायदे

उन्हाळ्याचा तडाखा सध्या सर्वत्र जाणवत आहे. अनेकजण उन्हाळ्यात फ्रेश राहण्यासाठी आणि घशाची कोरड घालवण्यासाठी कोल्ड ड्रिंक्स किंवा सोडा यांसारखे पेय पिणं पसंत करतात. मात्र फार कमी लोकांना हे माहित आहे की उन्हाळ्यात शरीराला नैसर्गिक थंडावा देण्यासाठी 'गुलकंद' हा फार उत्तम पर्याय आहे. 'गुलकंद' पचनक्रिया सुधारण्यापासून त्वचा निरोगी ठेवण्यापर्यंत आपल्यासाठी अंत्यत फायदेशीर ठरतं.


गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार करण्यात येणार 'गुलकंद' खाण्यासाठी चविष्ठ असण्याबरोबरच आपल्या शरीराला थंडावा देण्यासाठीही उत्तम मानला जातो. चला तर जाणून घेऊयात 'गुलकंद'चे फायदे.


ताज्या गुलाबाच्या पाकळ्या आणि साखर किंवा गूळ एकत्र करून 'गुलकंद' तयार केला जातो. उन्हाळ्यात थंडावा देणारा नैसर्गिक पदार्थ म्हणून 'गुलकंद' घराघरात वापरला जातो.


'गुलकंद'चं सेवन करणं फायदेशीर असून तुम्ही थेट चमचाभर गुलकंद खाऊ शकता. तसेच दूध किंवा दह्यासोबत मिक्स करूनही गुलकंदाचं सेवन केलं जातं.


हे आहेत 'गुलकंद' खाण्याचे फायदे


गुलकंदात गुलाबाच्या पाकळ्यांचे नैसर्गिक गुणधर्म असल्यानं हे शरीराला थंडावा देण्यासाठी फायदेशीर मानलं जातं.


उन्हाळ्यात बऱ्याचदा पोटाच्या समस्या उद्भवतात, अशा वेळी दररोज थोड्या प्रमाणात गुलकंदाचं सेवन केल्यानं पचन सुधारतं आणि ॲसिडिटीचा त्रास कमी होण्यास मदत मिळते.


गुलकंदात अँटी-ऑक्सिडंट्सचं प्रमाण जास्त असल्यानं हे शरीराची रोगप्रतिकार प्रणाली मजबूत ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं.


उन्हाळ्यात त्वचेच्या समस्या सामान्य असून त्वचा लवकर निस्तेज दिसू लागते. यावेळी त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी गुलकंद अत्यंत फायदेशीर ठरतो.


उन्हाळ्यात गुलकंदाचं सेवन केल्यानं शरीराचे तापमान संतुलित राहण्यास मदत होते.


उन्हाळ्यात तुम्ही गुलकंदाचा सरबत तयार करू शकता किंवा आईस्क्रीममध्येही मिक्स करून गुलकंदांचं सेवन करू शकता. उन्हाळ्यात गुलकंद घातलेलं थंड दूध किंवा सरबत पिणं अनेकजण पसंत करतात.

Comments
Add Comment

Ram Mandir Case, : राम मंदिर प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर नवी एसआयटी स्थापन

नवी दिल्ली : अयोध्या येथील राम मंदिरातील देणगीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात

Travel Outfits : प्रवासात कम्फर्ट आणि स्टाइल दोन्ही हवे? ट्राय करा हे ८ ट्रेंडी आउटफिट्स

लांबचा प्रवास असो किंवा विकेंड ट्रिप, स्टायलिश दिसतानाच आरामदायी कपडे घालणेही तितकेच महत्त्वाचे आहे. योग्य

Water Worship : तब्बल चार वर्षानंतर महापौरांच्या हस्ते गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जलपूजन

नाशिक : नाशिक महापालिकेतील प्रशासकीय राजवट संपुष्टात आल्यानंतर तब्बल चार वर्षानंतर गंगापूर धरणातील जलपूजनाचा

Special Intensive Revision : विशेष सखोल पुनरिक्षण १०० टक्के पूर्ण करण्यात चिपळूण राज्यात प्रथम

रत्नागिरी : मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचे काम १०० टक्के पूर्ण करणारा रत्नागिरी जिल्ह्यातील ‘२६५ –

Ladoo : राष्ट्रीय पुरस्कार विजेते शैलेंद्र सिंग यांचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण; सत्य घटनेवर आधारित 'लाडू' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टीत तब्बल २५ वर्षांचा सुवर्णकाळ गाजवणारे, ७२ वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांची निर्मिती

Night Walk : रात्रीच्या जेवणानंतर शतपावली किती महत्त्वाची?

शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेक लोक सकाळी व्यायाम आणि Morning Walk करतात. यामुळे नक्कीच शरीराला फायदे होतात यात काही शंका