महापालिकेत विरोधी पक्षनेत्यांचा झाला टाय टाय फिश; पाणी पट्टी वाढवल्याचा कांगावा करण्याचा प्रयत्न, आयुक्तांनी काढली हवा

मुंबई: मुंबई महापालिकेत विरोधी पक्षात बसलेल्या उबाठाच्या नगरसेवकांचा आपण सक्षम विरोधी पक्ष असल्याचे सिद्द करण्याचा प्रयत्न करत असून पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याच्या मुद्दयावर निवेदन करत सभागृहात वातावरण निर्मिती करण्यास गेलेल्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांचा टाय टाय फिश झाला आहे. मुंबईकरांवर पाणी पट्टीत ८ टक्के दरवाढ लादणे योग्य नसून हा वाढीव बोजा टाकण्यात येवू नये अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केला होता, परंतु अशाप्रकारची कोणतीही दरवाढ केली नाही आणि प्रस्तावितही नाही असे उत्तर प्रशासनाच्यावतीने अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी केल्यामुळे त्यांच्या निवेदनाची हवाच निघून गेली.


मुंबई महापालिकेच्या सभेमध्ये विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी महापालिका प्रशासनाने पाणीपट्टी करात ८ टक्के इतकी वाढ लादण्याचा हळूवार प्रयत्न केल्याचे दिसून येत असल्याचे सांगत अशाप्रकारचा कोणताही कर लावला जाणार नाही असे महापौरांनी सांगूनही प्रशासनाने याला थेट छेद दिल्याचा आरोप निवेदनाने केला. या निवेदनावरील प्रत्येक मुद्दयाची चिरफाड करत स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी त्यांचा समाचार घेतला. मुंबईत विविध प्रकल्प कामे सुरु करून त्याला गती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच मुंबईकरांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाणार नाही, त्यामुळे कोणत्याही प्रकारची करवाढ आणि दरवाढ या अर्थसंकल्पात केली जात नाही असे आश्वासन दिले. त्यामुळे मुंबईला पाणी देण्याची जबाबदारी आमची असून ८ टक्के पाणीपट्टीत वाढ झालेली नाही. त्यामुळे राजकीयदृष्ट्या दिशाभूल करण्याच्या हेतूने विरोधी पक्षनेत्यांनी हे निवेदन केल्याचे सांगितले. सन २०१२मध्ये या दरवाढी एकाच वेळी मान्यता दिली होती, परंतु तेव्हापासून ८ टक्के दरवाढ केव्हाही पूर्ण झालेली नाही.


तर काँग्रेसचे गटनेते अश्रफ आझमी यांनी पाण्याच्या थकीत रकमेच्या वसुलीसाठी अभय योजना राबवली जाणे आवश्यक असल्याचे सांगत ८० टक्के इमारतींना आजही टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला.


तर सभागृहनेते गणेश खणकर यांनी अनधिकृत जलजोडणी आणि पाणी गळती ही समस्या एका दिवसाची नसून केवळ राजकीय हेतून प्रेरित होवून विरोध करू नये. तर महापौर रितू तावडे यांच्या नावाचा उल्लेख विरोधी पक्षनेत्यांनी आपल्या निवेदनामध्ये केल्यामुळे मुंबईकरांना शुध्द पाण्याचा पुरवठा करतानाच ८ टक्के दरवाढीला स्थगिती देण्याचे जाहीर केले. पण त्यानंतर दरवाढ झालेलीच नाही, त्यामुळे विरोधी पक्षनेत्याने प्रशासनाकडून आधी माहिती घेवून निवेदन करायला पाहिजे होते असे सांगितले. यावर प्रशासनाच्यावतीने अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी कोणतीही नवीन पाण्याची दरवाढ प्रस्तावित नसून अर्थसंकल्पातही अशाप्रकारची करवाढ आणि दरवाढ केलेली नाही असे सांगत विरोधी पक्षनेत्यांच्या निवेदनाची हवा काढली.

Comments
Add Comment

BMC Waste Management : मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती: महानगरपालिकेकडे नोंदणी न करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

मुंबई : घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था व व्यक्तींनी

BMC News : एकही मॅनहोल्स उघडे राहता कामा नये

महापालिका आयुक्तांनी दिले संबंधित खात्यांसह सहायक आयुक्तांनाही निर्देश मुंबई : सध्या सुरू असलेली सर्व

Devendra Fadnavis : कला, संस्कृती अन् खाद्यसंस्कृतीची ओळख पटवून देणारा 'माटी ९ पूर्वांचल महोत्सव' : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय संस्कृती महान असून ही संस्कृती समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्राने anj पूर्वांचलने महत्त्वपूर्ण

Rain Update : वेळेआधीच मान्सून अंदमानात, महाराष्ट्रात २ ते ५ जून दरम्यान पावसाच्या आगमनाचा अंदाज

मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा 'अल निनो'चे

Weather Alert : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेची लाट

मुंबई : राज्यात सध्या एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे कडाक्याचे ऊन अशी दुहेरी हवामान स्थिती पाहायला मिळत आहे. याच

मुलुंड कालिदास नाट्य गृह परिसरातील टर्फसह अनधिकृतरित्या बांधकामांवर कारवाई

महापौरांचे आदेश आणि दुसऱ्याच दिवशी कारवाईला सुरुवात मुंबई :मुलुंड येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा