Indian Railway Rules: रेल्वे तिकीट आठ दिवसांपूर्वी रद्द केल्यावर रिफंड...; रेल्वेच्या नियमांत महत्त्वाचा बदल

नवी दिल्ली: केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी रेल्वे तिकीट प्रणाली आणि प्रवाशांच्या सुविधासंबंधित मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितलं की, यापुढे ट्रेन सुटण्याच्या ८ तासांपूर्वीपर्यंत तिकीट रद्द केल्यानंतर कोणताही रिफंड मिळणार नाही. हा नवीन नियम १ ते १५ एप्रिल २०२६ दरम्यान लागू होईल.


याशिवाय दुसऱ्या रिफंड स्लॅबमध्येही बदल करण्यात आला आहे. आता २४ ते ८ तासांदरम्यान तिकीट रद्द केल्यास तिकीटाची रक्कम ५० टक्क्यांपर्यंत कापली जाईल. यापूर्वी हा कालावधी १२ ते ४ तासांपर्यंत होता. तर ट्रेन सुटण्याच्या ७२ ते २४ तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यास तिकीटातील २५ टक्के रक्कम कापली जाईल. तर ७२ तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यास संपूर्ण रक्कम परत दिली जाईल. यादरम्यान रेल्वे प्रवाशांकडून केवळ फ्लॅट चार्ज घेण्यात येईल.


रेल्वे मंत्र्‍यांनी सांगितलं की, नवीन रिफंड नियम ब्लॅक मार्केटिंग आणि एजंटद्वारा शेवटच्या टप्प्यात तिकीट बुकिंग रोखण्यासाठी लागू करण्यात आला आहे. जानेवारी २०२६ पासून सुरू झालेली वंदे भारत स्लीपर आणि अमृत भारत II ट्रेनसाठी हा नियम आधीपासून लागू आहे. त्यांनी काऊंटर तिकीट खरेदीदारांसाठी क्लास अपग्रेडची सुविधादेखील वाढवली आहे. आता ट्रेन रवाना होण्याच्या ३० मिनिटांपर्यंत प्रवासी आपल्या प्रवासाचा क्लास अपग्रेड करू शकतात.

Comments
Add Comment

कर्नाटकात खळबळ, माजी आमदाराच्या मुलाची हत्या; जळालेल्या कारमध्ये...

धारवाड: कर्नाटकच्या धारवाडजवळील एका निर्जनस्थळी जळालेल्या कारमध्ये कोळसा झालेला मृतदेह सापडल्याने हत्येचा

Sonia Gandhi: सोनिया गांधींची प्रकृती बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक मंगळवारी रात्री

Supreme Court : अन्य धर्म स्वीकारल्यास एससी-एसटी दर्जा होणार रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने एससी-एसटी अधिनियमासंदर्भात आज, मंगळवार २४ मार्च रोजी मोठा निर्णय दिला आहे.

PM Narendra Modi : ‘होर्मुझ सामुद्रधुनीत अडथळा अस्वीकार्य’; लोकसभेत पंतप्रधान मोदींचा जगाला स्पष्ट संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील तणाव आणि युद्धस्थितीवर लोकसभेत महत्त्वपूर्ण निवेदन करताना

एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसचा पश्चिम आशियासाठी ३० विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय

नवी दिल्ली : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर, अनेक विमान कंपन्यांना पश्चिम आशियाई देशांमधील

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएची काश्मिरात छापेमारी

श्रीनगर : दिल्लीतील लाल किला स्फोट प्रकरणाच्या तपासात राष्ट्रीय जांच एजेंसी (एनआयए) ने आज, सोमवारी पहाटे काश्मीर