आनंदाची बातमी, नवी मुंबई विमानतळाची कनेक्टिव्हिटी वाढणार

बेलापूर : नवी मुंबई विमानतळ माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे २५ डिसेंबर २०२५ रोजी सुरू झाला. या विमानतळावरून २९ मार्च २०२६ पासून दररोज ७६ विमानसेवा उपलब्ध होणार आहेत. विमानसेवांची संख्या वाढत असल्यामुळे नवी मुंबई विमानतळावरील प्रवासी वर्दळही वाढणार आहे. या प्रवाशांच्या सोयीसाठी नवी मुंबई विमानतळाची कनेक्टिव्हिटी वाढवण्याचे नियोजन वेगाने सुरू आहे. विमानतळावर एक पॅसेंजर इंटरजेंज तयार करण्याचे नियोजन आहे. या इंटरजेंजद्वारे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ चार मेट्रो मार्गिकांशी जोडला जाईल.


मुंबई शहर ते नवी मुंबई अशी धावणार असलेली मेट्रो ८ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनस दोनपासून ही मार्गिका सुरु होईल आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडली जाईल. मेट्रो आठ वरील स्थानकावर मेट्रो ७ आणि मेट्रो ३ ला जोडणी मिळेल. मेट्रो आठवरून प्रवाशांना मेट्रो ४, मेट्रो २ आणि नवी मुंबई मेट्रो लाईन १ साठी इंटरचेंज मिळणार आहेत.


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला चार मेट्रो मार्गिकांळशी जोडणी मिळाल्यामुळे प्रवासी मेट्रोद्वारे कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस, मानखुर्द येथील आंतरराज्य बस टर्मिनसपर्यंत पोहोचू शकतील. सध्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणतेही रेल्वे स्थानक आणि मेट्रो स्थानक नाही. त्यामुळे प्रवाशांना रिक्षा, टॅक्सी, कॅब हे खर्चिक पर्याय वापरूनच विमानताळवर पोहोचता येते अथवा विमानतळावरून पुढे घराच्या अथवा हॉटेलच्या दिशेने प्रवास करावा लागतो. यात वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होतो. कनेक्टिव्हिटी मिळाल्यावर प्रवाशांच्या अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : दहशतवाद्यांचे अड्डे बनलेले मदरसे माझ्या रडारवर, मंत्री नितेश राणेंचा निर्वाणीचा इशारा

विजय मांडे, कर्जत : मदरसे दहशतवाद्यांचे अड्डे झाले आहेत. तिथे देशविरोधी गोष्टी शिकवल्या जातात. हे मदरसे माझ्या

Nashik TCS : टीसीएस प्रकरणी दानिश शेख यांचे बँक खाते सील

नाशिक : राज्यभर गाजत असलेल्या टीसीएस प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपी दानिश शेख याचे बँक खाते सील केले

Kharbao Business Park : खारबाव बिझनेस पार्क'चा विस्तार

ठाणे : मुंबई महानगर प्रदेशाचा संतुलित आणि आर्थिक विकास साधण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत मोठा निर्णय घेतला

MSRTC : ST BUS साठी उड्डाणपुलांखाली चार्जिंग स्टेशन उभारणार

मुंबई : राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) इलेक्ट्रिक बस अर्थात ‘लालपरी’साठी पुलांखालच्या मोकळ्या जागांचा

Sansad Ratna 2026 : ‘संसदरत्न २०२६’मध्ये महाराष्ट्राचा दबदबा

नवी दिल्ली : संसदेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १२ खासदारांसह ४ संसदीय स्थायी समित्यांची ‘संसदरत्न पुरस्कार

Air India : एअर इंडिया मुंबईहून देशांतर्गत उड्डाणे कमी करणार, २८० साप्ताहिक उड्डाणे करणार रद्द

मुंबई : एअर इंडिया १ जून ते १ ऑगस्ट या कालावधीत मुंबईहून २८० साप्ताहिक देशांतर्गत उड्डाणे कमी करणार. ही कंपनीकडून