महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा रक्तप्रवाह थांबतो. तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्यानं हृदयविकाराची समस्या उद्धवते.


हृदयविकाराच्या झटक्याचं नेमकं कारण काय?


वाढतं कोलेस्ट्रॉल, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, अनुवांशिक घटक, तंबाखू आणि मद्यपान, अतिरिक्त ताण आणि हृदयाचे जुनाट आजार यांसारख्या गोंष्टींकडे दुर्लक्ष केल्यास हृदयविकाराच्या झटक्याचा धोका वाढतो.


महिलांपेक्षा पुरुषांना हृदयविकाराचा धोका जास्त


हृदयविकाराचा झटका हा आजार सामान्य झाला असला तरी पुरुष आणि स्त्रियांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याच्या प्रमाणात मोठा फरक आढळतो. हा आजार पुरुष आणि स्त्रियांसाठीही धोकादायक आहे, परंतु आकडेवारीनुसार पुरुषांना हृदयविकाराचा जास्त धोका असतो. पुरुषांमध्ये पहिल्या हृदयविकाराच्या झटक्याचे सरासरी वय सुमारे ६५ वर्षे असते, तर स्त्रियांमध्ये ते सुमारे ७२ वर्षे असते. याचा अर्थ असा की, स्त्रियांमध्ये हा धोका पुरुषांपेक्षा अंदाजे १० वर्षांनी उशिरा वाढतो.


तज्ञांच्या मते, महिलांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी असतो, ज्याचं मुख्य कारण इस्ट्रोजेन हे असू शकते. जरी हे पूर्णपणे सिद्ध झाले नसले तरी, असे मानले जाते की यामुळे हृदयाच्या आरोग्याचे रक्षण होण्यास मदत होते. तर दुसरीकडे, पुरुष जास्त प्रमाणात तंबाखू आणि मद्यपान करतात, जे हृदयविकाराचे प्रमुख कारण आहेत. , पुरुषांमध्ये तणाव व्यवस्थापनाची क्षमता महिलांपेक्षा कमी असते असे मानले जाते. सततचा ताण आणि मानसिक दबावाचा हृदयावर नकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका वाढण्याची शक्यता असते.


अशी घ्या काळजी


हे समजून घेणं महत्त्वाचं फार महत्वाचं आहे की, योग्य ती काळजी घेतल्यास हृदयविकाराचा झटका पूर्णपणे टाळता येतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणी करणं आणि रक्तातील साखर, कोलेस्ट्रॉल व रक्तदाब नियंत्रणात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. याबरोबरच फळ, पालेभाज्या, मीठ आणि साखर कमी असलेला आरोग्यदायी आहार घेणं आपल्या हृदयासाठी फायदेशीर ठरते.

Comments
Add Comment

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या