ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना मोठी भेट

मुंबई : ठाणे महानगरपालिकेतील 'गट ड' श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेला प्रश्न आता मार्गी लागणार आहे. या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी असलेली पाच वर्षांची अट शिथिल करून ती तीन वर्षे करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत दिली. आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी नियम ९७ अन्वये उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.


इतर महापालिकांच्या धर्तीवर होणार बदल


मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात माहिती दिली की, पदोन्नतीसाठीचा हा विषय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चिला गेला आहे. सध्या कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि अकोला महानगरपालिकांमध्ये पदोन्नतीसाठी तीन वर्षांचा निकष लागू आहे. याच धर्तीवर ठाणे महानगरपालिकेतही तीन वर्षांची नियमित सेवा पूर्ण केलेल्या आणि आवश्यक पात्रता असलेल्या कर्मचाऱ्यांना 'वर्ग ३' मध्ये पदोन्नती देण्यासाठी शासन सकारात्मक आहे.


पुढील प्रक्रिया आणि ठराव


हा निर्णय अंमलात आणण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचा अधिकृत ठराव राज्य सरकारला प्राप्त होणे आवश्यक आहे. हा ठराव प्राप्त होताच अन्य महानगरपालिकांप्रमाणे ठाणे पालिकेतही पदोन्नतीचा नवा नियम लागू करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले.


अनुकंपा नियुक्तीबाबत संवेदनशील भूमिका


पदोन्नतीसोबतच अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्यांच्या विषयावरही मंत्र्यांनी महत्त्वाची टिप्पणी केली. "अनुकंपा नियुक्ती हा विषय अत्यंत संवेदनशील असून पात्र कुटुंबीयांना वेळेत न्याय मिळणे आवश्यक आहे," असे सामंत म्हणाले. ठाणे महानगरपालिकेच्या आगामी भरती प्रक्रियेत, विशेषतः शिक्षण मंडळामध्ये प्रलंबित असलेल्या अनुकंपा प्रकरणांचा समावेश करण्याबाबत पालिकेला सुचित केले जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

Comments
Add Comment

म्हाडा गाळेधारकांना मोठा दिलासा! भाडेकरार धोरणासाठी विशेष समिती स्थापन करणार; मंत्री शंभूराज देसाईंची विधान परिषदेत माहिती

मुंबई : मुंबईसह राज्यातील म्हाडा वसाहतींमध्ये भाडेतत्त्वावर व्यवसाय करणाऱ्या गाळेधारकांच्या अनेक वर्षांच्या

राज्यातील कापूस खरेदीला मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्राकडे मागणी; मंत्री जयकुमार रावल यांची विधान परिषदेत माहिती

मुंबई : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि जास्तीत जास्त कापूस सरकारी दराने खरेदी केला जावा,

सहकार क्षेत्र अधिक गतिमान करण्यासाठी लवकरच सर्वसमावेशक नवे सहकार धोरण; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

मुंबई : सहकार क्षेत्र हे सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचे मॉडेल आहे. राज्यातील सहकार क्षेत्र अधिक सक्षम, पारदर्शक आणि

माजलगाव वाळू तस्करी प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल - मुख्यमंत्री

मुंबई : बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे कथित पोलिसांच्या संगनमतातून सुरू असलेल्या वाळू तस्करी प्रकरणात संशयित तीन

'आरटीई' अंतर्गत विद्यार्थ्यांकडून साहित्याच्या नावाखाली पैसे घेण्यास परवानगी नाही

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे; शाळांची २ हजार ९०० कोटींची प्रतिपूर्ती बाकी मुंबई : मोफत आणि सक्तीच्या

गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या सर्व प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय

पुनर्वसन आणि मोबदल्यासाठी लवकरच उच्चस्तरीय बैठक; राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची विधानसभेत माहिती मुंबई: