सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील राड्यावरून शंभूराज देसाई आक्रमक

मुंबई : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या राड्याचे पडसाद सोमवारी विधानपरिषदेत उमटले. ‘आम्ही सुरक्षित आहोत की नाही?’ असा संतप्त सवाल करत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा पोलीस अधीक्षकांच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला. त्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांचे निलंबन करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले.


सोमवारी विधानपरिषदेचे कामकाज सुरू होताच सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत झालेल्या गोंधळाचा मुद्दा चर्चेत आला. यावेळी मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. आपली कैफियत मांडताना शंभूराज देसाई अत्यंत आक्रमक झाले. ते म्हणाले, "निवडणुकीच्या वेळी १०० पोलिसांनी आम्हाला धक्काबुक्की केली. एका मंत्र्याला अशी वागणूक मिळत असेल, तर आम्ही न्याय कोणाकडे मागायचा? संबंधित पोलीस अधीक्षक (एसपी) हे एका जिल्ह्याचे अधिकारी म्हणून नव्हे, तर कुणाचे तरी 'घरगडी' असल्यासारखे वागले आहेत. मंत्र्यांवर अरेरावी करणाऱ्या तुषार दोषी यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे. तसेच या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी", अशी मागणी त्यांनी केली.


जयकुमार गोरेंनी घेतला आक्षेप


दुसरीकडे, मंत्री जयकुमार गोरे यांनी या आरोपांचा प्रतिवाद करीत तीव्र आक्षेप नोंदवला. "निवडणूक सुरू असताना तिथे ३ ते ४ हजार लोक का जमले होते? कायद्याचे उल्लंघन नेमके कोणी केले, याचीही चौकशी व्हायला हवी. सभापतींनी आदेश देण्यापूर्वी वस्तुस्थिती जाणून घ्यावी. पोलीस चुकीचे असतील तर कारवाई नक्कीच व्हावी, पण पोलिसांनी कोणाच्या दमदाटीमुळे कोणाला आत सोडले, याचीही सत्यता समोर आली पाहिजे," असे गोरे यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

FDA Raid On KFC and Dominos : KFCमध्ये सडलेलं चिकन, Domino’sवरही कारवाई; ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना FDA चा दणका

FDA Raid On KFC and Dominos : महागड्या दरात खाद्यपदार्थ विकणाऱ्या मोठ्या फूड ब्रँड्सच्या अन्नगुणवत्तेवर पुन्हा एकदा

Suman Kale Murder Case : पारधी समाजाच्या सुमन काळे हत्या प्रकरणात राज्य शासनाची नव्याने एसआयटी; विशेष तपास पथक गठित

अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील पारधी समाजातील सुमन काळे यांच्या सन २००७ मधील संशयास्पद पोलिस कोठडीतील मृत्यू

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

Ashish Shelar : दहिहंडी उत्सवाला युनेस्कोमध्ये घेऊन जाणार, सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री अँड आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे दहिहंडी उत्सवाला युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा यादीत नेण्यासाठी प्रयत्न करीत

Chandigaon Tiranga Case : चंडीगाव ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणा, राष्ट्रध्वजाचा अवमान

डहाणू : स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाच्या सन्मानाबाबत डहाणू तालुक्यातील चंडीगाव ग्रामपंचायतीच्या कारभारातील