The 50 शो जिंकूनही शिव ठाकरेनं गमावलं ५० लाखाचं बक्षिस

शिव ठाकरेची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा होतेयं. बिग बॉस मराठी गाजवल्यानंतर आता शिव ‘The 50’ या प्रसिद्ध शोचा विजेता झाला आहे. या शोमधील सर्व स्पर्धकांना मागे टाकत दमदार खेळ आणि स्ट्रॅटेजीच्या बळावर शिव ठाकरेनं ‘The 50’ शोची ट्रॉफी जिंकलीआहे.


रिअ‍ॅलिटी शोच्या दुनियेत सध्या शिव ठाकरे जोरदार चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘The 50’ जिंकल्यानंतर विजेतेपदाच्या ट्रॉफीसोबत शिवला ५० लाखांची रक्कमही मिळालेली आहे. मात्र, आता ही रक्कम शिव ठाकरेला मिळणार नसून विजेतेपदासोबत मिळालेली ५० लाखांची प्राईज मनी त्यानं स्वतःकडे न ठेवता थेट आपल्या चाहत्याला दिली आहे.


‘The 50’ या शोमध्ये एकूण ५० सेलिब्रिटी सहभागी झाले होते. टीव्ही, सोशल मीडिया आणि म्युझिक इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध कलाकार या शोमध्ये झळकले.


‘The 50’ शोचा फॉरमॅट वेगळा असून विजेत्या स्पर्धकाला मिळणारी रक्कम त्याच्या नोंदणीकृत फॉलोअर्समधून निवडलेल्या ‘नंबर वन फॅन’ला दिली जाते. त्यामुळे शिव ठाकरेने जिंकलेले ५० लाख रुपये सीताराम प्रल्हाद अघाव या त्याच्या चाहत्याला देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

नवऱ्याचं कौतुकचं नाही, अभिनेत्री दीपिका पदुकोण सोशल मिडियावर ट्रोल

अभिनेता रणवीर सिंहच्या धुरंधर 2 सिनेमानं जगभरात धूमाकूळ घातली आहे. धुरंधरनं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत

अभिनेत्री अनुष्का शर्मा ८ वर्षांनी पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार ?

अभिनेत्री अनुष्का शर्मानं बॉलिवूडच्या अनेक मोठ्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. तसेच, बॉलिवूडच्या तिन्ही

अखेर आलियानं सोडलं धुरंधरबद्दल मौन , कौतक करत चाहत्यांसोबत शेअर केला 'हा' इमोशनल सीन

अभिनेता रणवीर सिंहच्या धुरंधर सिनेमाचं वेडं जगभरात सर्वत्र पाहायला मिळत आहे. धुरंधर २ सिनेमानं

अभिनेता सनी देओलच्या पोस्टवर चक्क पाकिस्तानी चाहत्याची कमेन्ट; म्हणाला...

अभिनेता सनी देओल सध्या बॉर्डर २ मुळे चांगलाच चर्चेत असून नुकताच नेटफ्लिक्सवर बॉर्डर २ सिनेमा रिलीज झाला. तसेच,

मराठमोळा शिव ठाकरे ठरला 'द ५० इंडिया' शोचा विजेता

मुंबई: मराठी अभिनेता शिव ठाकरे याने 'द ५० इंडिया' शोच्या विजेतेपदाचा मान मिळवला आहे. त्याने 'द ५० इंडिया' ट्रॉफी आणि

बिग बॉसच्या घरातून वाईल्ड कार्ड स्पर्धक घेणार एक्झिट, 'या' नावाची चर्चा

बिग बॉसच्या घरातील सदस्य उत्तम खेळ खेळत असून बिग बॉस मराठीच्या 6 व्या सिझननं प्रेक्षकांमध्ये चांगलीच खळबळ उडवून