मराठमोळा शिव ठाकरे ठरला 'द ५० इंडिया' शोचा विजेता

मुंबई: मराठी अभिनेता शिव ठाकरे याने 'द ५० इंडिया' शोच्या विजेतेपदाचा मान मिळवला आहे. त्याने 'द ५० इंडिया' ट्रॉफी आणि ५० लाख रुपयांची बक्षीस रक्कम जिंकली आहे, जी त्याने नंतर त्यांच्या एका चाहत्याला दिली. लोकप्रिय रिॲलिटी शो 'द ५० इंडिया' शोचा अंतिम भाग प्रसारित झाला. हा शो १ फेब्रुवारी रोजी सुरू झाला, ज्यामध्ये ५० स्पर्धकांनी लायन पॅलेसमध्ये प्रवेश केला. दररोजच्या चढ-उतारांना तोंड देत, पाच स्पर्धक अंतिम भागापर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले. हा रिॲलिटी शो टीव्ही, सोशल मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील ५० सेलिब्रिटी स्पर्धकांसह सुरू झाला होता.



शिव ठाकरे ठरला 'द ५० इंडिया'चा विजेता


'द ५० इंडिया' शोच्या महाअंतिम सोहळ्यात शिव ठाकरे विजेता घोषित झाला. ही ट्रॉफी जिंकण्यासाठी त्याने मिस्टर फैसू, काकाजी, रजत दलाल आणि कृष्णा श्रॉफ यांच्याशी स्पर्धा केली. 'द ५० इंडिया' शोच्या आधी, ठाकरेने 'बिग बॉस मराठी २' जिंकला होता आणि तो 'बिग बॉस १६' चा पहिला उपविजेता होता. या विजयानंतर चाहत्यांनी त्याचे सोशल मीडियावर अभिनंदन केले आणि त्याचा विजय योग्य असल्याचे म्हटले. या विजयामुळे त्याने रिॲलिटी शोमधील आपली प्रचंड फॅन फॉलोविंग आणि लोकप्रियता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.


ग्रँड फिनालेमध्ये शिव ठाकरेने 'द ५० इंडिया' ट्रॉफी आणि ५० लाख रुपयांचा चेक जिंकला. शोच्या स्वरूपानुसार, विजेत्याच्या नोंदणीकृत फॉलोअर्सपैकी एकाला बक्षिसाची मोठी रक्कम मिळाली. सीताराम प्रल्हाद अघाव यांना नंबर वन फॅन म्हणून घोषित करण्यात आले. सेमी-फिनालेचे टास्क रजत दलाल, प्रिन्स नरुला, शिव, फैसू, अर्चना गौतम, मनीषा राणी, नेहा चुडासमा, रिद्धी डोगरा, उर्वशी ढोलकिया, काका आणि कृष्णा यांच्यात झाले. प्रिन्सने फिनालेचे तिकीट जिंकले, जे त्याने शिवला दिले, त्यामुळे तो फायनलिस्ट बनला.





कोण आहे शिव ठाकरे?


शिव ठाकरे हा एक लोकप्रिय अभिनेता आणि उद्योजक आहे. त्याने 'बिग बॉस मराठी २' जिंकला होता आणि 'बिग बॉस १६' मध्ये तो उपविजेते ठरला. ९ सप्टेंबर १९८९ रोजी महाराष्ट्रातील अमरावती येथे जन्मलेला ठाकरे 'एमटीव्ही रोडीज रायझिंग' आणि 'खतरों के खिलाडी १३' मुळे घराघरात पोहोचला.

Comments
Add Comment

Sangli School Van Accident : धक्कादायक! स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातून आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय मुलीचा जागीच

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित · ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील

Maharashtra News : राज्यातील प्रत्येक विभागात भव्य लोककला महोत्सव; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रातील लोककला आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्याच्या प्रत्येक विभागात भव्य

ST Employees Salary : एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा; 11 ऑगस्टला खात्यात जमा होणार जुलैचे वेतन

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन 11 ऑगस्ट रोजी

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी घेतली 'ताज हॉटेल्स'च्या सीईओंची भेट

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी

Food Poisoning : आश्रमशाळेच्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा; २७ मुले, ५ मुली उपजिल्हा रुग्णालयात

नांदेड : देगलूर तालुक्यातील हणेगावच्या वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत जेवणातून