मुंबईत मिळकतीचे फेरफार मिळणार ऑनलाईन - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

 ३० लाख नागरिकांना मिळणार लाभ


मुंबई : मुंबई शहर जिल्ह्यातील मालमत्ताधारकांसाठी महसूल विभागाने मोठी घोषणा केली आहे. यापुढे मिळकतींच्या फेरफाराची प्रक्रिया पूर्णपणे 'डिजिटल' होणार असून, मुंबईत प्रथमच तब्बल ४५ प्रकारच्या फेरफारांसाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचा लाभ मुंबईतील सुमारे ३० लाख नागरिकांना मिळेल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.


मुंबई शहर आणि उर्वरित महाराष्ट्रातील 'प्रॉपर्टी कार्ड' संगणकीकरणाच्या प्रणाली भिन्न असल्यामुळे आतापर्यंत मुंबईत ऑनलाईन फेरफार प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडथळे येत होते. मात्र, नागरिकांची वाढती गरज लक्षात घेऊन शासनाने विशेष ऑनलाईन प्रणाली विकसित केली असून, आता घरबसल्या अर्जाची सोय उपलब्ध झाली आहे.


मुंबई शहर जिल्ह्यातील १९ महसूल विभाग आणि ४ नगररचना योजनांमधील सुमारे २७ हजार ८४७ मिळकत पत्रिका आता 'mahabhumi.gov.in' या संकेतस्थळावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधेमुळे नागरिकांना आपल्या अर्जाची सद्यस्थिती देखील ऑनलाईन तपासता येणार आहे. त्यामुळे आता फेरफाराच्या कामासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज भासणार नाही.


या नव्या प्रणालीमध्ये केवळ खरेदीखतच नव्हे, तर वारसा नोंद, बक्षीसपत्र, भाडेपट्टा, गहाणखत, रोड सेटबॅक, आरक्षण आणि भूसंपादन अशा विविध ४५ प्रकारच्या नोंदींसाठी ऑनलाईन अर्ज करता येतील. या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल महसूल मंत्र्यांनी मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल आणि त्यांच्या टीमचे विशेष कौतुक केले.

Comments
Add Comment

Bandra News : वांद्रे स्टेशन परिसरात अतिक्रमण हटवताना दगडफेक; ४ पोलीस, ६ आंदोलक जखमी

मुंबई : वांद्रे पूर्वेकडील बेहरामपाडा परिसरात रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईदरम्यान

Cyprus and India : सायप्रस आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक संबंध दृढ

सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस 'इश्का' बॉलिवूड चित्रपटाचा थाटात मुहूर्त मुंबई :

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :