Kalyan: नागरिकांच्या घरांवर फेकले सुतळी बॉम्ब; कल्याणमधील व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ

मुंबई: कल्याण जवळील आंबिवली परिसरात नशेखोराकडून नागरिकांच्या घरांवर सुतळी बॉम्ब फेकल्याची घटना नुकतीच घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता नागरिकांसमोर नव्या संकटानं डोकं वर काढलं आहे. काही नशेखोरांनी सतीश यादव नावाच्या व्यक्तीच्या घरात जाऊन त्याला नाहक त्रास देत दिला. हा संतापजनक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नशेखोरांच्या गैरवर्तणुकीमुळे नागरीक त्रस्त झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सतिशने पोलिसांना फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली. दरम्यान, नशेखोरांच्या विरोधात पोलिसांनी ठोस कारवाई करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. कल्याणमधील आंबिवलीनजीक पाटील नगर हा परिसर आहे. या परिसरात नशेखोर नागरिकांना त्रास देतात. काही दिवसांपूर्वी रात्रीच्या अंधारात काही नशेखोर नागरिकांच्या घरावर सुतळी बॉम्ब टाकत होते. त्यामुळे या परिसरात दहशत निर्माण झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली, याची माहिती समोर आली नाही.


व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून हे प्रकरण समोर आलं. सतिश नावाचा व्यक्ती पोलिसांकडे मदत मागत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळतं. त्याचदरम्यान काही नशेखोर त्याला धरून ठेवतात. तो त्यांना त्या परिसरातून निघून जाण्यास सांगतो. हा व्हिडीओ व्हायरल होताच नागरिकांनी पोलिसांकडे कारवाईची मागणी केली. आरोपींविरोधात ठोस कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.




Comments
Add Comment

दातृत्वाचा धनी हरपला! दत्ता मेघे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून श्रद्धांजली

मुंबई: ज्येष्ठ नेते, माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाने दातृत्वाचा धनी हरपला आहे. शिक्षण संस्थांचे जाळे

वकिलांना ३ महिने काळ्या कोटापासून मिळणार सुट्टी; जाणून घ्या कारण

पुणे : वाढत्या उष्णतेमुळे वकिलांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या काळात पारंपरिक काळा

मिठीच्या सफाईची घाई; कंत्राटदारांच्या पाया पडणार की खात्यामार्फत करणार?

मुंबई: मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीतील गाळाची सफाई करण्यासाठी आता कंपन्याच पुढे

अशोक खरात कारनाम्याचा भांडाफोड, १८ मार्च रोजी कसा झाला आरोपी?, जाणून घ्या

नाशिक: बड्या बेड्या नेत्यांचा 'गुरु' असलेल्या कॅप्टन अशोक खरातच्या कारनाम्याचा भांडाफोड सुरू झाला आहे. जवळपास ५८

मुंबई महापालिकेत विरोधकांची हवा गुल... काय आहे कारण जाणून घ्या

मुंबई: मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आली असली तरी उबाठा आणि काँग्रेसच्या रुपात सक्षम विरोधी पक्ष असतानाही

पेपर सुरु असताना विद्यार्थिंनीसोबत घडला लाजिरवाणा प्रकार, नेमकं घडलं काय?

नाशिक: नाशिकमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. १३ मार्च रोजी दहावीचा पेपर सुरू असताना एका