आसाममध्ये पोलीस कमांडो कॅम्पवर दहशतवादी हल्ला

तिनसुकिया : आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील पोलीस कमांडो कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. रविवारी मध्यरात्री दोन नंतर दहशतवाद्यांनी हल्ला सुरू केला. दहशतवाद्यांनी कॅम्पला लक्ष्य करून मॉर्टरद्वारे पाच आरपीजी गोळे डागले. यातील चार गोळे कॅम्पच्या आत फुटले. या हल्ल्यात कॅम्पमधील चार जवान जखमी झाले. जखमी कमांडोंवर कॅम्पमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जवान जखमी होण्याव्यतिरिक्त कॅम्पमध्ये आणखी काही नुकसान झाले आहे की नाही हे अद्याप समजलेले नाही. पोलीस कमांडो कॅम्पवरील हल्ल्याचा तपास सुरू आहे.


तिनसुकियाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मयंक कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे एक पथक घटनेनंतर तात्काळ घटनास्थळी पोहोचले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या हल्ल्यानंतर तिनसुकिया जिल्हा आणि अप्पर आसामच्या इतर भागांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.


याआधी ऑक्टोबर २०२५ मध्ये दहशतवाद्यांनी तिनसुकियातील काकोपाथर येथील भारतीय लष्कराच्या छावणीवर गोळीबार केला होता, ज्यात तीन जवान किरकोळ जखमी झाले होते. मध्यरात्रीच्या सुमारास हल्लेखोरांनी एका धावत्या वाहनातून छावणीवर गोळीबार केला होता. लष्कराने तात्काळ प्रत्युत्तर दिले होते. पण हल्लेखोर वाहनातून सुसाट वेगाने पळून गेले होते. बंदी घातलेल्या युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम-इंडिपेंडंट या दहशतवादी गटाने लष्करी छावणीवर हल्ला केला होता. आता पोलिसांच्या कॅम्पवर झालेल्या हल्ल्यातही बंदी घातलेल्या युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम-इंडिपेंडंट या दहशतवादी गटाचाच हात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.


आसामध्ये विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. राज्यात ९ एप्रिल रोजी मतदान होईल आणि ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आसामच्या नागरिकांमध्ये दहशत पसवण्याच्या उद्देशानेच पोलीस कमांडो कॅम्पवर हल्ला करण्यात आल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

Iran-US-Israel War : भारतीय भूमीचा इराण हल्ल्यासाठी वापर नाही; भारताने फेटाळून लावले 'ते' दावे

भारत सरकारने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका दाव्याचे खंडन करत स्पष्ट केले आहे की, भारताने अमेरिकेला आपल्या

तिबेटशी व्यापार करणाऱ्या भारतीयांसाठी आनंदाची बातमी

पिथोरगड : भारतीय व्यावसायिक जून २०२६ पासून तकलाकोटमधील कायमस्वरुपी दुकानांतून तिबेटशी थेट व्यापार करू शकणार

विमान प्रवास महागणार? देशांतर्गत भाड्यावरील मर्यादा हटवण्याचा केंद्राचा निर्णय

मुंबई : देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. केंद्र सरकारने देशांतर्गत विमान भाड्यांवरील

Indian Navy : भारतीय नौदलाची नवी स्टेल्थ युद्धनौका ‘तारागिरी’ लवकरच नौदलाच्या ताफ्यात केली जाणार समाविष्ट

भारताच्या सागरी सार्वभौमत्वाच्या क्षेत्रातील निर्णायक क्षण, असे वर्णन करता येईल, अशा शानदार समारंभात, भारतीय

अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतात वादळी पावसाची शक्यता

नवी दिल्ली : पश्चिमी विक्षोभामुळे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत अशा तीन देशांच्या सीमा ओलांडणारा तब्बल १,०००

सौदी अरेबियातील हल्ल्यात भारतीय नागरिकाचा मृत्यू; भारतीय दूतावासाकडून शोकसंवेदना

सौदी अरेबियातील रियाध येथे १८ मार्च रोजी एका भारतीय नागरिकाच्या दुर्दैवी मृत्यूबाबत भारतीय दूतावासाने