अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतात वादळी पावसाची शक्यता

नवी दिल्ली : पश्चिमी विक्षोभामुळे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत अशा तीन देशांच्या सीमा ओलांडणारा तब्बल १,००० किलोमीटर लांबीचा पावसाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे मार्च महिन्यातच मे महिन्यासारखी उष्णता अनुभवणाऱ्या जनतेला दिलासा मिळणार आहे.


हवामान तज्ज्ञांच्या मते, साधारणपणे पश्चिमी चक्रावात किंवा विक्षोभ हे वक्राकार असतात. मात्र, यंदाचा हा कमी दाबाचा पट्टा एका सरळ रेषेत असून तो हजारो किलोमीटरपर्यंत पसरला आहे. अशा प्रकारची सरळ रचना अत्यंत दुर्मीळ मानली जाते. या रचनेमुळे ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा यांसह वादळी पावसाची निर्मिती होत आहे, ज्याचा अनुभव सध्या उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये येत आहे. पश्चिमी विक्षोभ साधारणपणे हिवाळ्याच्या काळात पश्चिम दिशेकडून पाऊस आणि बर्फवृष्टी घेऊन येतात. ही हजारो किमी मार्गावर सरळ रेषेत पसरलेली नवी प्रणाली तिच्या वेगळ्या आकारामुळे आणि यंदा मार्चमध्येच तापलेल्या प्रदेशांना काही प्रमाणात दिलासा देणारी ठरू शकते. एरवी वक्राकार असणारी ही प्रणाली इतक्या मोठ्या अंतरापर्यंत सरळ रेषेत असणे हे वातावरणातील 'जेट स्ट्रीम' मधील बदलांमुळे असू शकते. हवामान बदलाचा संकेतही मानण्यात येत आहे.


काही दिवसांपूर्वी दिल्लीसह उत्तर भारतात पारा ३७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. ऐन मार्चमध्येच उन्हाळ्याच्या झळा बसू लागल्याने नागरिक हैराण झाले होते. मात्र, या चक्रावाताच्या आगमनामुळे तापमानात ३ ते ७ अंशांची मोठी घट झाली असून वातावरणात गारवा पसरला आहे. या आगळ्यावेगळ्या विक्षोभाच्या परिणामी पडणारा पाऊस, वादळी वारे आणि विजेचा कडकडाट पाहता सावधगिरी बाळगावी, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिला आहे. काही ठिकाणी गारपिटीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

अमेरिकेने रंग दाखवला मग भारतासाठी चीन उभा राहिला, चीनने थेट भारताचा झेंडा पोस्ट करत म्हटले....

Donald Trump on India: बाळ जन्माला येते आणि लगेच अमेरिकन नागरिक होते, 'इथे एका मूलाला लगेच नागरिकत्व मिळते आणि ते संपूर्ण

लग्नाच्या 10 दिवस आधी होणाऱ्या बायकोचं मोठं कांड समोर आलं, बॉयफ्रेंडने नको नको ते सर्वच सांगितलं

मध्यप्रदेश : लग्न हा आयुष्यात अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय समजला जातो. जर जोडीदार योग्य असेल तर पुढील आयुष्य

India - Nepal Border : नेपाळकडून सीमेवर नवीन कडक नियम; भारतीय प्रवाशांवर परिणाम

भारत-नेपाळ सीमेवरील प्रवास आणि व्यवहारांमध्ये मोठे बदल झाले असून नेपाळ सरकारने भारतीय प्रवाशांसाठी नवीन व कडक

Heatwave in Odisha : ओडिशात उष्णतेचा कहर; झारसुगुडा ठरले देशातील सर्वाधिक तापमानाचे शहर

देशात सध्या उष्णतेची तीव्र लाट उसळली असून ओडिशा राज्य या उष्णतेच्या तडाख्यात सापडले आहे. किनारपट्टीपासून ते

Online Gaming Sector : ऑनलाइन गेमिंग क्षेत्रासाठी १ मेपासून नवा कायदा

देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑनलाइन गेमिंग क्षेत्राला नियमनात आणण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले

Bengal Election 2026 : बंगाल निवडणुकीला हिंसक वळण : कुठे कार्यकर्त्यांवर हल्ले तर कुठे ईव्हीएम वादामुळे वातावरण तापले

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना