नाशिक - जिल्हाधिका-यांनी घेतला सप्तशृंग गड येथे तयारीचा आढावा

नाशिक : वणी गडावरील चैत्र यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज सकाळी सप्तशृंग गड (ता. कळवण) येथे भेट देऊन विविध सुविधा व व्यवस्थांची पाहणी करीत अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.


वणी गडावरील श्री सप्तश्रुंगी देवीचा यात्रोत्सव २६ मार्चपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून नियोजन करण्यात आले आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तहसीलदार रोहिदास वारुळे, पोलिस निरीक्षक टेंभेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता वसावे यांच्यासह वीज वितरण, जिल्हा परिषदेचे अधिकारी, गडाचे विश्वस्त, उपसरपंच संदीप बेनके, प्रदीप निकम आदी उपस्थित होते.


जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की, सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यातच भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी, स्वच्छ्ता आदींचे नियोजन करावे. भाविकांना टप्प्या - टप्प्याने दर्शनासाठी सोडावे. मंदिर परिसरात आगप्रतिबंधक उपाययोजना कराव्यात. पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य सेवा तसेच इतर पायाभूत सुविधांची योग्य व नियोजनबद्ध व्यवस्था करावी, असेही त्यांनी सांगितले.


भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पोलीस बंदोबस्त ठेवावा, गर्दी नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. तसेच, यात्रेदरम्यान अनावश्यक गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन सर्व व्यवस्था सुरळीतपणे पार पाडाव्यात. त्यासाठी सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कश्मिरा संखे यांची इन्सिडंट कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.


तहसीलदार वारुळे यांनी यात्रेसाठी केलेल्या तयारीची माहिती दिली. दरम्यान, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी ही गड परिसरास भेट देऊन पोलिस बंदोबस्ताचा सविस्तर आढावा घेतला.

Comments
Add Comment

Water Cut : पुण्यात सोमवारपासून २५ टक्के पाणीकपात

पुणे : यंदा पावसाळा लांबल्यामुळे आणि धरणसाठ्यात घट झाल्याने पुणे महापालिकेने पाणीपुरवठ्यात २५ टक्के कपात

Konkan Railway : कोकण रेल्वे दुपदरीकरणासाठी तांत्रिक तपासणी सुरू

रत्नागिरी : वाढती प्रवासी आणि मालवाहतूक, वारंवार विस्कळीत होणारे वेळापत्रक आणि गणेशोत्सव काळातील अतिरिक्त

Nasrapur : नसरापूर खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात

पुणे  : संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिलेल्या नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि खून खटल्याची सुनावणी

Pandharpur : पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन दोन दिवस बंद राहणार

पंढरपूर : पंढरपुरचे विठ्ठल मंदिर २३ आणि २४ जून रोजी विठ्ठल मंदिर सर्व प्रकारच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद राहणार

Raigad News: आईने चार मुलांना विषारी थंडपेय पाजून स्वतःही केले विषप्राशन; तिघांचा मृत्यू, दोन मुलांची प्रकृती गंभीर

रायगड : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण

Palghar Crime : पालघरमध्ये भररस्त्यात तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; CCTV व्हायरल, प्रकृती चिंताजनक

Palghar Crime : पालघर : पालघर (Palghar) शहरात भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला (Attack) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली