अचानक मोबाईलचं नेटवर्क गायब झाल्यास 'या' गोष्टी करा

सध्याच्या काळात मोबाईल प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे. आजच्या काळात एकमेकांशी संपर्क साधण्याबरोबरच अनेक महत्वाच्या कामांसाठी मोबाईल फोन हा अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे मोबाईलला नेटवर्क असणं खुप गरजेचं झालं आहे. कॉल करणे, मेसेज पाठवणे, इंटरनेटचा वापर करणे या सर्व गोष्टी फोनवरच अवलंबून आहेत. मात्र, काहीवेळी अचानकच फोनचं नेटवर्क गायब होतं. त्यामुळे काहीवेळा ‘No Service’/ ‘Emergency Calls Only’ असं फोनवर दिसतं. ही खुप सामान्य समस्या आहे. पण लोकांना वाटतं की, कंपनीच्या चूकीमुळे ही गोष्ट घडते.


याबाततची काही कारणं ही नेटवर्कशी संबंधित असतात तर काही फोन किंवा सिमशी संबंधित असतात. तसेच, आपल्या लोकेशनशीही संबंधित असतात.
याबाबतच सर्वात मोठं कारण म्हणजे सिग्नल पोहोचण्यात अडचण येत असल्यानं देखील या गोष्टी घडतात.


या समस्येचे सर्वात मोठे कारण म्हणजे सिग्नल कमकुवत असणे आहे हे देखील असू शकतं.


काहीवेळा सण-उत्सवात, मॅच किंवा मोठ्या इव्हेंट दरम्यान अनेकजण एकाच टॉवरशी कनेक्ट होतात. यामुळे नेटवर्क ओव्हरलोड होतं आणि सिग्नल अचानक खाली येतं. तसेच, भारतात यूझर्सची संख्या जास्त प्रमाणात असल्यामुळे मोठी शहरं किंवा ऑफिसच्या परिसरात ही समस्या समान्य आहे.


तुम्ही राहत असलेला परिसर टॉवरपासून खुप दूर असेल किंवा टॉवरवर मेंटेनेंस/रिपेयरचं काम सुरू असेल तर यावेळी नेटवर्क अचानक गायब होते. कधी-कधी नेटवर्क स्विचमध्ये प्रॉब्लम असल्यामुळेही ही समस्या उद्भवते. 5G एरियामध्ये 5G सिग्नल कमकुवत झालं तर फोन ऑटोमॅटिक 4G वर शिफ्ट होऊ शकत नाही आणि यामुळं नेटवर्क जातो.



सिम कार्ड जुनं असणे, खराब, लूज किंवा डॅमेज असेल तरीही नेटवर्क अचानक गायब होतं. सिम काढून स्वच्छ करुन पुन्हा बसवा किंवा दुसऱ्या स्लॉटमध्ये ट्राय करा. तुम्हाला सिम स्वॅपिंग किंवा अॅक्टिव्हेशन प्रॉब्लम असेल तरीही असं होण्याची शक्यता असते.


नेटवर्क अचानक गेल्यावर 'या' गोष्टी करा
लोकेशन बदलून पाहावं किंवा फोन रिस्टार्ट करावा. तसेच, एयरप्लेन मोड 10-15 सेकंदांसाठी ऑन-ऑफ करून पाहावं.
मोबाईल डेटा आणि नेटवर्क मोडदेखील चेक करावा.
तसेच, सिम काढून पुन्हा बसवा किंवा दुसऱ्या फोनमध्ये ट्राय करा.
वारंवार असं होत असल्यास नेटवर्क कंपनीच्या कस्टमर केअरशी संपर्क साधा किंवा सॉफ्टवेअर अपडेट चेक करून पाहा.


या समस्या घरबसल्याही दुरुस्त करता येतात. पण जर या समस्या सतत उद्भवत असतील तर कंपनीकडून टॉवर इश्यू किंवा तुमच्या परिसरात कव्हरेज कमी असल्यामुळेदेखील हे घडू शकतं. त्यामुळे या गोष्टींची काळजी घेतल्यास हा प्रॉब्लम दूर होण्यास मदत होते.

Comments
Add Comment

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाविषयी महत्वाची अपडेट

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. या प्रकल्पातील

MHADA Lottery: मुंबईसह ठाण्यात बंपर लॉटरी, पाच हजार घरांची लॉटरी कोणत्या प्राईम लोकेशनवर?

मुंबई: मुंबई-ठाणे या शहरात हक्काचे घर घेणे सामान्यांच्या आवाक्या बाहेर आहे मात्र याच शहरात तुमचं घर होणारं.

Mumbai Metro: मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; आता मेट्रोमध्ये मोबाईल पूर्णपणे बंद राहणार

मुंबई : मेट्रोने दररोज प्रवास करणाऱ्यांसाठी एक आश्चर्यजणक बातमी समोर आलेली आहे. आता मेट्रोतून प्रवास करताना

उन्हाळी सुट्ट्यांसाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांची घोषणा

मुंबई : उन्हाळ्यातील सुट्ट्या आणि लग्नसराईमुळे वाढलेल्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने

Navi Mumbai: शिक्षिकेचं भयंकर कृत्य; दोन विद्यार्थ्यांनी संपवलं आयुष्य

नवी मुंबई: नवी मुंबईतील घणसोली परिसरात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. येथील एका नामांकित शाळेतील

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची घेतली सांत्वनपर भेट

मुंबई : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज देवगिरी शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार