Mumbai Metro: मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; आता मेट्रोमध्ये मोबाईल पूर्णपणे बंद राहणार

मुंबई : मेट्रोने दररोज प्रवास करणाऱ्यांसाठी एक आश्चर्यजणक बातमी समोर आलेली आहे. आता मेट्रोतून प्रवास करताना तुमचा मोबाईल पूर्णपणे बंद राहणार आहे. सर्व प्रकार समोर येताच प्रवाशांमध्ये गोंधळाचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.


गेल्या काही दिवसांपासून मेट्रोने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून भुयारी मेट्रोनेही असंख्यजण प्रवास करत आहेत. पण भुयारी मेट्रोच्या दक्षिण मुंबईतील स्थानकांत प्रवाशांना इंटरनेट सेवेमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून अजूनही या स्थानकांच इंटरनेट सेवा सुरु झाली नाही. आता दुसऱ्या बाजूला आरे ते बीकेसीपर्यंत सुरु असलेली इंटरनेट सेवाही आता बंद करण्यात आलेली आहे.



नेमकं कारण काय?



समोर आलेल्या माहितीनुसार,जी इंटरनेटसाठी यंत्रणा उभी करणारे कंत्राटदार होते, त्यातील कंत्राटदराने कंत्राटातील अटी आणि शर्थींचे उल्लंघन केले असल्याने एमएमआरसीएलने हे कंत्राट रद्द केले आहे.


मेट्रो ३ आरे ते कफ परेड ही भुयारी मार्गिका ३३.५ किमीची असून ऑक्टोबर २०२४ मध्ये आरे ते बीकेसी हा टप्पा सुरु करण्यात आलेला होता. मग यानंतर बीकेसी ते आचार्य अत्रे चौक हा टप्पा २०२५ मध्ये सुरु करण्यात आला आणि त्यात सर्व भुयारी मार्गिकांमध्ये इंटरनेट सेवा देण्यात आली होती. मात्र आता काही महिन्यात सुरु करण्यात आलेल्या आचार्य आत्रे ते कफ परेड या शेवटच्या टप्प्यात इंटरनेट सेवा सुरु करण्यात आलेली नाही.


यावर पर्याय म्हणून लवकरच नव्याने ही यंत्रणा उभारण्यासाठी पुन्हा एकदा निविदा काढली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असणारी संपर्क यंत्रणा भुयारी मेट्रो स्थानकांत उपलब्ध असल्याचे एसएसआरसीएलकडून सांगण्यात आलेले आहे.


आरे ते वरळी या पहिल्या टप्प्यातील मेट्रो स्थानकांवर एअरटेल आणि वोडाफोन तसेच जिओचे नेटवर्क प्रवाशांसाठी उपलब्ध होते. परंतू नेटवर्कची यंत्रणा उभारणाऱ्या कंपनीकडून जास्त प्रमाणात शुक्लाची मागणी केली जात असल्याचे कारण देत या कंपन्यांनी माघार घेतल. मग परत काही कंपन्यांची सेवा पुन्हा सुरु करण्यात एमएमआरसीएलला यश आले. मात्र आता ही यंत्रणा उभारणारी कंपनी तसेच सेवा पुरवठादार कंपन्यांमधील मतभेद कायम राहिलेले आहे.

Comments
Add Comment

Mumbai Birth Certificate Scam : मुंबईतील बोगस जन्म मृत्यू प्रमाणपत्र प्रकरणी SIT तपास करणार

मुंबई : मुंबईतील बोगस जन्म मृत्यू प्रमाणपत्र प्रकरणी एसआयटी तपास करणार आहे. यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे

New Syllabus : शैक्षणिक वर्ष २०२६ - २७ पासून दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीसाठी नवा अभ्यासक्रम

मुंबई : इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी दिल्यानंतर राज्य शिक्षण मंडळाच्या

Thorium : थोरियम आधारित अणुऊर्जा तंत्रज्ञान महाराष्ट्रासाठी ठरणार गेम चेंजर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नाणार प्रकल्पामुळे महाराष्ट्र १० वर्षे पुढे गेला असता मुंबई : महाराष्ट्राच्या

Central Railway : मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांच्या जलद कारवाईमुळे कल्याण स्टेशनवर जीव वाचला

 मुंबई :  मध्य रेल्वेच्या सतर्क स्टेशन कर्मचाऱ्यांनी आज कल्याण स्टेशनवर एका संभाव्य दुर्घटनेला यशस्वीरित्या

Divya Dakshin Yatra : IRCTC सोबत भारताच्या आध्यात्मिक वारशाचा अनुभव; भारत गौरव पर्यटन ट्रेन 26 मे 2026 रोजी नागपूरहून प्रस्थान करणार

मुंबई : Indian Railway Catering and Tourism Corporation (IRCTC) तर्फे 11 रात्री / 12 दिवसांची विशेष “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटन ट्रेनद्वारे

Tourism Minister Shambhuraj Desai : अजिंठा परिसराचा सर्वांगीण पर्यटन विकास साधणार

सिल्लोड-सोयगावमधील पर्यटन प्रकल्पांना गती देण्यासाठी मुंबईत आढावा बैठक मुंबई : जागतिक स्तरावर पर्यटनदृष्ट्या