बदलापूर ते नवी मुंबई थेट लोकलचा प्रस्ताव

बदलापूर : बदलापूर येथून थेट नवी मुंबईपर्यंत लोकल सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने मोठी हालचाल सुरू झाली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नव्या रेल्वे मार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेश दिल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सध्या बदलापूरहून नवी मुंबईला जाण्यासाठी प्रवाशांना ठाणे येथे बदल करून हार्बर मार्गाने प्रवास करावा लागतो. यामुळे वेळ आणि गर्दी दोन्ही वाढतात. नव्या प्रकल्पामुळे हा त्रास कमी होणार आहे. या प्रस्तावानुसार बदलापूर आणि वांगणीदरम्यान कासगाव येथे नवीन रेल्वे स्थानक उभारण्याची योजना असून, तेथून नवी मुंबईतील कामोठेपर्यंत नवीन मार्ग विकसित करण्याचा विचार आहे. या प्रस्तावालाही तत्त्वतः मान्यता देण्यात आली असून प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे समजते. विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, स्थानिक स्तरावरूनही या मागणीसाठी पाठपुरावा करण्यात आला होता. आता रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानंतर या प्रकल्पाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

India in Venezuela : व्हेनेझुएलामधील भारताची मदत मोहीम अधिक तीव्र; चोवीस तास मोफत वैद्यकीय सेवा सुरू

व्हेनेझुएला : ऑपरेशन ‘अमिस्ताद’ (Amistad)अंतर्गत भूकंपग्रस्त व्हेनेझुएलामध्ये तैनात भारतीय लष्कराचे फील्ड

Ahilyanagar : सार्वजनिक ठिकाणी गांजा ओढताना 65 जण रंगेहाथ ताब्यात; पोलिसांच्या कारवाईने परिसरात खळबळ

Ahilyanagar : जिल्ह्यात वाढत्या अंमली पदार्थांच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी अहिल्यानगर पोलिसांनी (Ahilyanagar Police) मोठी धडक

Bollywood movies : जुलैमध्ये बॉक्स ऑफिसवर मनोरंजनाचा भडका ; 'अल्फा' ते 'धमाल 4'सह या 7 हिंदी चित्रपटांचा तडका

Bollywood movies : तुम्ही चित्रपट प्रेमी असाल तर ही बातमी तुमच्याचसाठी आहे. चित्रपटप्रेमींसाठी जुलै महिना मनोरंजनाची

Nashik : देशातील 12'हीट रेसिलियंट सिटीज'मध्ये नाशिकचा समावेश, शहरासाठी पाच कोटींचा विकास आराखडा

Nashik : काँक्रिटीकरणाचा वेग आणि हवामानातील सातत्याने होणार बदल यामुळे निर्माण होणाऱ्या 'अर्बन हीट आयलंड'च्या

Jalgaon : वारीच्या आनंदावर शोककळा, ट्रॅक्टर अपघातात एक ठार तर १५ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

Jalgaon : सोमवारपासून महाराष्ट्रात वारीचा उत्साह पहायला मिळतोय. अनेक ठिकाणाहून सोमवारी पंढरपूरच्या दिशेने

Navi Mumbai : धक्कादायक घटना ! अवघ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

नवी मुंबई : आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपल्या सोबत कधी काही होईल सांगता येत नाही. नवी मुंबई(Navi Mumbai) मध्ये एक