बदलापूर ते नवी मुंबई थेट लोकलचा प्रस्ताव

बदलापूर : बदलापूर येथून थेट नवी मुंबईपर्यंत लोकल सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने मोठी हालचाल सुरू झाली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नव्या रेल्वे मार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेश दिल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सध्या बदलापूरहून नवी मुंबईला जाण्यासाठी प्रवाशांना ठाणे येथे बदल करून हार्बर मार्गाने प्रवास करावा लागतो. यामुळे वेळ आणि गर्दी दोन्ही वाढतात. नव्या प्रकल्पामुळे हा त्रास कमी होणार आहे. या प्रस्तावानुसार बदलापूर आणि वांगणीदरम्यान कासगाव येथे नवीन रेल्वे स्थानक उभारण्याची योजना असून, तेथून नवी मुंबईतील कामोठेपर्यंत नवीन मार्ग विकसित करण्याचा विचार आहे. या प्रस्तावालाही तत्त्वतः मान्यता देण्यात आली असून प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे समजते. विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, स्थानिक स्तरावरूनही या मागणीसाठी पाठपुरावा करण्यात आला होता. आता रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानंतर या प्रकल्पाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

Davkhare : गावदेवी भाजी मंडई आग दुर्घटनेप्रकरणी दुर्घटनाग्रस्तांना नुकसानभरपाई द्या, आमदार डावखरेंची मागणी

Thane : ठाण्यातील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या गजबजलेल्या गावदेवी भाजी मंडईमध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागून

Prasad Lad : प्रसाद लाड यांनी स्वीकारले जरांगे पाटील यांचे चर्चेचे निमंत्रण; उद्या आंतरवलीत भेट

मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार?; २३ मे च्या 'डेडलाईन'पूर्वी सरकारच्या वतीने मध्यस्थी मुंबई : मराठा आरक्षणाच्या

आता गावकऱ्यांना मिळणार मोफत मिळकत पत्रिका

सनद फी माफ करण्याची महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा; ग्रामविकास विभाग प्रस्ताव तयार करणार मुंबई : ग्रामपंचायत

वाई येथे लघुकुंभमेळ्याचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न

वाईच्या लघुकुंभ मेळ्याची महती संपूर्ण राज्यात पसरणार:-जयकुमार गोरे सातारा वाई नगरीला “दक्षिण काशी” अशी ओळख

पक्षसंघटनेची एकजुटीने मजबूत बांधणी करणार

प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांचा निर्धार मुंबई; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व समज-गैरसमज दूर झाले आहेत.

BCCI : निवड समितीचा मोठा निर्णय! भारत अ संघात अचानक बदल; या ऑलराउंडरला मिळाली संधी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने भारत A संघात मोठा बदल केला आहे. आगामी श्रीलंका दौऱ्यातील ट्राय