समुद्री मार्ग खुले ठेवा, व्यापारात अडथळे नकोत; मोदींचे इराणच्या राष्ट्राध्यक्षांना शांततेचे आवाहन

नवी दिल्ली : पश्चिम आशियामध्ये इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असताना, भारताने या वादात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोठे राजनैतिक पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी शनिवारी इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मसूद पेजेश्कियन यांच्याशी फोनवरून सविस्तर चर्चा केली. गेल्या आठ दिवसांतील या दोन्ही नेत्यांमधील ही दुसरी चर्चा असून, भारताने या प्रदेशातील शांतता आणि स्थिरतेसाठी पुन्हा एकदा आग्रही भूमिका मांडली आहे. पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियन यांना ईद-उल-फितर आणि इराणचे नवीन वर्ष नवरोज निमित्त शुभेच्छा दिल्या. ‘हा सण पश्चिम आशियात शांतता, स्थिरता आणि समृद्धी घेऊन येईल,’ अशी आशा पंतप्रधान मोदींनी यावेळी व्यक्त केली. या शुभेच्छांसोबत पंतप्रधान मोदींनी पश्चिम आशियात बिघडत चाललेल्या सुरक्षा व्यवस्थेवर तीव्र चिंता व्यक्त केली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संवादादरम्यान पश्चिम आशियातील बिघडत चाललेल्या परिस्थितीवर भारताची भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडली. त्यांनी प्रामुख्याने प्रादेशिक सुरक्षा, जागतिक व्यापार आणि मानवी हित या तीन गोष्टींवर भर दिला.
पंतप्रधानांनी पश्चिम आशियातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर होणाऱ्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला. अशा हल्ल्यांमुळे केवळ प्रादेशिक स्थिरता धोक्यात येत नाही, तर जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होऊन जगाच्या अर्थव्यवस्थेवरही विपरीत परिणाम होतो, असे त्यांनी नमूद केले. तसेच होर्मुझची सामुद्रधुनी हा समुद्री मार्ग सुरक्षित राहणे अनिवार्य असल्याचे मोदींनी सांगितले. युद्धामुळे होणारी निष्पाप नागरिकांची जीवितहानी आणि मालमत्तेच्या नुकसानीबद्दल पंतप्रधानांनी खोलवर दुःख व्यक्त केले. या कठीण काळात इराणमधील भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि त्यांचे हित ही भारताची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.


भारताची जागतिक नेत्यांशी चर्चा


पश्चिम आशियातील संकट ओळखून पंतप्रधान मोदी सातत्याने जागतिक नेत्यांच्या संपर्कात आहेत. शुक्रवारी त्यांनी बहरीनचे राजे हमद बिन ईसा अल खलिफा यांच्याशी चर्चा केली होती. यापूर्वी त्यांनी कतारचे अमीर, जॉर्डनचे राजे आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशीही संवाद साधला आहे. "कोणताही वाद हा केवळ संवाद आणि मुत्सद्देगिरीनेच सुटू शकतो," हे भारताचे अधिकृत धोरण असल्याचे सांगितले जात आहे.


वाढता तणाव आणि भारताची भूमिका


एकीकडे अमेरिका आणि इस्रायल इराणमधील सत्तापालटासाठी आक्रमक पवित्रा घेत आहेत, तर दुसरीकडे इराणचे नवीन सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी शत्रूंसमोर न झुकण्याची शपथ घेतली आहे. अशा कठीण काळात भारत मध्यस्थाची भूमिका बजावत आहे.

Comments
Add Comment

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची घेतली सांत्वनपर भेट

मुंबई : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज देवगिरी शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

पाकड्यांना पाठवली ईदी, लष्कर-ए-तोयबाचा कमांडर बिलाल आरिफ सलाफी ठार

मुरीदके : पाकिस्तानला अज्ञातांनी ईदी पाठवली आहे. पाकिस्तानमधील मुरीदके येथील लश्कर-ए-तोयबा (LeT) या दहशतवादी

माजी उपमहापौर अलका केरकर यांचे निधन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या माजी उपमहापौर आणि वॉर्ड क्रमांक ९८ च्या भाजपच्या विद्यमान नगरसेविका अलका

'जैन समाजाची सेवा, त्याग, अहिंसेची परंपरा समाजासाठी प्रेरणादायी'

मुंबई : जैन समाजाने समाजसेवा, दानधर्म, अहिंसा आणि त्याग या मूल्यांवर आधारित कार्यातून समाजासमोर प्रेरणादायी

अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतात वादळी पावसाची शक्यता

नवी दिल्ली : पश्चिमी विक्षोभामुळे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत अशा तीन देशांच्या सीमा ओलांडणारा तब्बल १,०००

मुंबईकरांवर पाणी संकटाची टांगती तलवार

मुंबई : मुंबईला दरदिवशी होणाऱ्या एकूण पाणी पुरवठ्याच्या निम्म्या पाण्याचे शुद्धीकरण भांडुप संकुलातील