Stormy weather : वादळी हवामानाचा अनेक उड्डाणांवर परिणाम; एअरलाइनकडून प्रवाशांसाठी ट्रॅव्हल ऍडव्हायझरी जारी

नवी दिल्ली : देशातील दोन प्रमुख शहरे दिल्ली आणि बंगळुरू येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा परिणाम हवाई सेवांवरही होऊ शकतो.यामुळे इंडिगो, एअर इंडिया आणि स्पाइसजेट यांनी प्रवाशांसाठी ट्रॅव्हल अॅडव्हायझरी जारी करत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.


इंडिगोने आपल्या प्रवाशांना सावध करत सांगितले आहे की खराब हवामानामुळे विमानांच्या आगमन आणि प्रस्थानात किरकोळ विलंब होऊ शकतो. एअरलाइनने म्हटले आहे की परिस्थिती हाताळण्यासाठी त्यांच्या टीम्स आधीपासून सज्ज आहेत, मात्र हवामानाच्या परिणामामुळे उड्डाण संचालनाचा वेग काहीसा मंदावू शकतो. प्रवाशांनी विमानतळावर जाण्यापूर्वी आपल्या फ्लाइटचा स्टेटस नक्की तपासावा, असा सल्ला देण्यात आला आहे.


तर एअर इंडियाने माहिती दिली आहे की दिल्ली आणि उत्तर भारतातील काही भागांत सतत पाऊस आणि जोरदार वाऱ्यांचा अंदाज आहे, ज्यामुळे दिल्लीहून येणाऱ्या-जाणाऱ्या उड्डाणांवर परिणाम होऊ शकतो. एअरलाइनने प्रवाशांना विनंती केली आहे की विमानतळासाठी निघण्यापूर्वी फ्लाइटची स्थिती तपासावी आणि संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेऊन अतिरिक्त वेळ ठेवून घरातून निघावे.


दरम्यान, स्पाइसजेटने कळवले आहे की लेह येथे खराब हवामानामुळे सर्व आगमन आणि प्रस्थान उड्डाणे प्रभावित होऊ शकतात. त्यामुळे संबंधित कनेक्टिंग फ्लाइट्सवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रवाशांनी आपल्या फ्लाइटची स्थिती सतत तपासत राहावी, असा सल्ला एअरलाइनकडून देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Nari Shakti Vandan Sammelan : पंतप्रधान नरेंद्र मोदी नारी शक्ती वंदन संमेलनाच्या माध्यमातून कर्तृत्ववान महिलांशी संवाद साधणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नारी शक्ती वंदन संमेलनाच्या

Earned Leave : कर्मचाऱ्यांना सुट्यांच्या बदल्यात मिळणार पैसे

नवी दिल्ली : देशातील लाखो नोकरदारांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या नव्या लेबर कोडमुळे आता न वापरलेल्या

Asha Bhosle : स्वरस्वामिनी आशा भोसले यांना पंतप्रधान मोदींनी वाहिली खास मराठीतून आदरांजली

मुंबई : प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचे मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या

Manipur Violence : उग्रवाद्यांच्या भीषण हल्ल्यात BSF जवान शहीद, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद

मणिपूरच्या (Manipur Violence) उखरुल जिल्ह्यात शुक्रवारी (१० एप्रिल) उग्रवाद्यांच्या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ)

Supreme Court : 'मतदान करणे आणि निवडणूक लढवणे हे मूलभूत अधिकार नाहीत'

नवी दिल्ली : मतदानाचा अधिकार किंवा निवडणूक लढवण्याचा अधिकार यांपैकी कोणताही अधिकार हा 'मूलभूत अधिकार' नाही, असे

Ahmedabad Dosa Batter Death : डोसा पीठ प्रकरणात नवीन खुलासा, मुलींच्या मृत्यूपूर्वी आईने उंदीर नाशकाची केली होती खरेदी

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबाद शहरातील चांदखेडामध्ये राहणाऱ्या प्रजापती कुटुंबातील २ चिमुकल्या बहिणींचा