होर्मुझमध्ये अडकलेल्या भारतीय कॅप्टनचा मृत्यू; १८ दिवस समुद्रात अडकून वैद्यकीय मदतीअभावी दुर्दैवी अंत

पश्चिम आशियातील तणावाचा मानवी परिणाम समोर आला असून होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या ‘अवाना’ जहाजाचे कॅप्टन राकेश रंजन सिंह (Rakesh Ranjan Singh) यांचे निधन झाले आहे. २८ फेब्रुवारीपासून जहाज समुद्रात अडकले होते आणि तब्बल १८ दिवस तेथेच थांबावे लागले.


मूळचे बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील रहिवासी असलेले सिंह यांचे कुटुंब सध्या रांची येथे राहते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.


माहितीनुसार, १८ मार्च रोजी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. जहाजावरील अधिकाऱ्यांनी दुबई एटीसीकडे एअर अॅम्ब्युलन्सची मागणी केली, मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे परवानगी मिळू शकली नाही. त्यानंतर बोटीने किनाऱ्यावर आणण्याचा प्रयत्न झाला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. अखेरीस हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.


‘अवाना’ जहाजावर कॅप्टन सिंह यांच्यासह सुमारे ३५ कर्मचारी अडकले होते. या काळात त्यांना आवश्यक वैद्यकीय सुविधा मिळू शकल्या नाहीत, ज्यामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचे बोलले जात आहे.

Comments
Add Comment

ऊर्जा क्षेत्रात गुंतवणुकीसाठी पंतप्रधान मोदींचे जागतिक गुंतवणूकदारांना आमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक गुंतवणूकदारांना भारताच्या ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले

पश्चिम आशियात तणाव वाढला; पंतप्रधान मोदींनी केली आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा

- ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ल्यांचा भारताकडून तीव्र निषेध पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर

गोव्याचे मुख्यमंत्री लेकीला भेटायला पुण्यात आले अन् रुग्णालयात अॅडमिट झाले, नेमकं झालं काय?

पुणे: गुढी पाडव्यानिमित्ताने आपल्या मुलीला भेटण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पुण्यात आले होते.

Stormy weather : वादळी हवामानाचा अनेक उड्डाणांवर परिणाम; एअरलाइनकडून प्रवाशांसाठी ट्रॅव्हल ऍडव्हायझरी जारी

नवी दिल्ली : देशातील दोन प्रमुख शहरे दिल्ली आणि बंगळुरू येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा

Iran-US-Israel War : इराण - कतार तणावाचा थेट भारताला फटका; वीज उत्पादन धोक्यात

मध्य पूर्वात भडकलेल्या युद्धाची झळ आता भारताच्या स्वयंपाकघरांपासून ते कारखान्यांपर्यंत पोहोचली आहे. इराणने

गुप्तचर विभाग RAW चे माजी प्रमुख काय म्हणाले; युद्धात आपण इराणची साथ...

नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकट गडद होत चाललं आहे. इराण,