गुप्तचर विभाग RAW चे माजी प्रमुख काय म्हणाले; युद्धात आपण इराणची साथ...

नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकट गडद होत चाललं आहे. इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचा परिणाम भारतासह अनेक देशांवर होताना दिसतोय. अशा परिस्थितीत भारताच्या गुप्तचर यंत्रणा रॉचे (Research and Analysis Wing RAW) माजी प्रमुख अमरजीत सिंह दुलत यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ANIने दिलेल्या वृत्तानुसार, सध्याच्या परिस्थितीत इराण या संघर्षात वरचढ ठरू शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.


इराणच्या बाजूने परिस्थिती


अमरजीत सिंह दुलत म्हणाले की, भारताचे इराणसोबत जुने आणि मजबूत संबंध आहेत. आम्ही नेहमीच इराणसोबत उभे राहिलो आहोत. सध्याच्या घडामोडींचा विचार करता इराण या संघर्षात जिंकू शकतो, असेही त्यांनी नमूद केले. मात्र, सुरू असलेला संघर्ष चिंताजनक असून तो दुर्दैवी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.


भारत-इराण संबंधांची पार्श्वभूमी


भारत आणि इराण यांच्यातील संबंध स्वातंत्र्यानंतर सातत्याने दृढ होत गेले. 1950 ते 1970 या काळात इराणचा कल अमेरिकेकडे असतानाही भारताशी संबंध कायम राहिले. 1979 च्या इस्लामिक क्रांतीनंतर इराणच्या परराष्ट्र धोरणात बदल झाला. तरीही भारताने संतुलित भूमिका घेत इराण आणि पाश्चिमात्य देशांशी संबंध टिकवले. ऊर्जा क्षेत्रात इराण हा भारतासाठी महत्त्वाचा तेल पुरवठादार राहिला आहे.


भारतासाठी धोरणात्मक महत्त्व


चाबहार बंदर हे भारत-इराण संबंधांमधील अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. भारत या बंदराच्या विकासात सक्रिय राहिला आहे. या बंदरामुळे पाकिस्तानला बायपास करत भारताला अफगाणिस्तान आणि मध्य आशियात थेट प्रवेश मिळतो.


व्यापारासाठी महत्त्वाचा मार्ग


International North South Transport Corridor (INSTC) हा भारत, इराण आणि रशिया यांना जोडणारा महत्त्वाचा प्रकल्प आहे. व्यापार आणि लॉजिस्टिक्स सुलभ करण्यासाठी हा मार्ग उपयुक्त आहे. तसेच युरोप-आशिया कनेक्टिव्हिटी मजबूत करणारा हा मार्ग आहे.


भारतासमोरील ऊर्जा आव्हान


पश्चिम आशियामधील वाढत्या संघर्षामुळे तेल आणि गॅसच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम भारतासारख्या आयातदार देशांवर होऊ शकतो.

Comments
Add Comment

India US critical minerals deal : भारत-अमेरिकेमध्ये खनिज करार

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेमध्ये मंगळवारी महत्त्वपूर्ण दुर्मीळ खनिजे व महत्त्वाच्या खनिज पुरवठा साखळीबाबत

कांदा प्रश्नी केंद्र व राज्य सरकारची बुधवारी बैठक

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनामुळे (कांदा दर आणि अनुदानाचा प्रश्न)

Madhya Pradesh : ४२ नवरदेव लग्नमंडपात वाट पाहत राहिले, पण एकही नवरी आली नाही; सामूहिक विवाहाच्या नावाखाली मध्य प्रदेशात लाखोंचा गंडा!

अंगावर भरजरी शेरवानी, गळ्यात सुवासिक झेंडूच्या फुलांचे हार, हातात आनंदाने आणलेले मिठाईचे डब्बे आणि डोळ्यांत

Mantri Nitesh Rane : हर्षवर्धन सपकाळ यांनी लायकीनुसार बोलावे ! मंत्री नितेश राणे

मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेला

Uttar Pradesh Road Accident : आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; पोलिस अधिकारी आणि कैद्यासह ६ जणांचा मृत्यू, ३२ प्रवासी जखमी

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर आज म्हणजेच मंगळवार २६ मे रोजी पहाटे भीषण अपघात

Kanpur Shocker : कानपूरमध्ये SSC-GD परीक्षेचा बोजवारा! एकाच केंद्रावर क्षमतेपेक्षा दुप्पट विद्यार्थ्यांची गर्दी; दोन्ही सत्रांतील परीक्षा रद्द

कानपूर : कर्मचारी निवड आयोगाच्या (Staff Selection Commission) भोंगळ कारभाराचा एक मोठा नमुना कानपूरमध्ये सोमवारी पाहायला मिळाला.