गुप्तचर विभाग RAW चे माजी प्रमुख काय म्हणाले; युद्धात आपण इराणची साथ...

नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकट गडद होत चाललं आहे. इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचा परिणाम भारतासह अनेक देशांवर होताना दिसतोय. अशा परिस्थितीत भारताच्या गुप्तचर यंत्रणा रॉचे (Research and Analysis Wing RAW) माजी प्रमुख अमरजीत सिंह दुलत यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ANIने दिलेल्या वृत्तानुसार, सध्याच्या परिस्थितीत इराण या संघर्षात वरचढ ठरू शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.


इराणच्या बाजूने परिस्थिती


अमरजीत सिंह दुलत म्हणाले की, भारताचे इराणसोबत जुने आणि मजबूत संबंध आहेत. आम्ही नेहमीच इराणसोबत उभे राहिलो आहोत. सध्याच्या घडामोडींचा विचार करता इराण या संघर्षात जिंकू शकतो, असेही त्यांनी नमूद केले. मात्र, सुरू असलेला संघर्ष चिंताजनक असून तो दुर्दैवी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.


भारत-इराण संबंधांची पार्श्वभूमी


भारत आणि इराण यांच्यातील संबंध स्वातंत्र्यानंतर सातत्याने दृढ होत गेले. 1950 ते 1970 या काळात इराणचा कल अमेरिकेकडे असतानाही भारताशी संबंध कायम राहिले. 1979 च्या इस्लामिक क्रांतीनंतर इराणच्या परराष्ट्र धोरणात बदल झाला. तरीही भारताने संतुलित भूमिका घेत इराण आणि पाश्चिमात्य देशांशी संबंध टिकवले. ऊर्जा क्षेत्रात इराण हा भारतासाठी महत्त्वाचा तेल पुरवठादार राहिला आहे.


भारतासाठी धोरणात्मक महत्त्व


चाबहार बंदर हे भारत-इराण संबंधांमधील अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. भारत या बंदराच्या विकासात सक्रिय राहिला आहे. या बंदरामुळे पाकिस्तानला बायपास करत भारताला अफगाणिस्तान आणि मध्य आशियात थेट प्रवेश मिळतो.


व्यापारासाठी महत्त्वाचा मार्ग


International North South Transport Corridor (INSTC) हा भारत, इराण आणि रशिया यांना जोडणारा महत्त्वाचा प्रकल्प आहे. व्यापार आणि लॉजिस्टिक्स सुलभ करण्यासाठी हा मार्ग उपयुक्त आहे. तसेच युरोप-आशिया कनेक्टिव्हिटी मजबूत करणारा हा मार्ग आहे.


भारतासमोरील ऊर्जा आव्हान


पश्चिम आशियामधील वाढत्या संघर्षामुळे तेल आणि गॅसच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम भारतासारख्या आयातदार देशांवर होऊ शकतो.

Comments
Add Comment

NTA : पेपरफुटीवर केंद्राचा 'मास्टरप्लॅन'! NTA साठी 'सुपर 6' समितीची नियुक्ती

पेपर लीकवर केंद्राचा मोठा प्रहार! दोषींना १० वर्षांपर्यंत तुरुंगवास, ₹१० कोटींपर्यंत दंड; संसदेत सोमवारी

PM Narendra Modi : 'युवकांना स्वावलंबी बनवणे हे सरकारचे ध्येय'

नवी दिल्ली: 'विकसित वायब्रंट व्हिलेज कार्यक्रम २०२६' च्या सहभागींसोबत रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे

Amit Shah : युवा पिढी आणि विद्यार्थी आमच्यासाठी महत्वाचे : अमित शाह

धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या कामाचंही कौतुक नवी दिल्ली : भाजप कार्यकर्त्यांसाठी पदापेक्षा देश खूप जास्त

Karnataka Politics : '२०२८ ची कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवणार नाही': माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या

बंगळुरु : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी निवडणूक राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Assam Factory Blast : आसाममधील रॉड मॅन्युफॅक्चरिंग कारखान्यात भीषण स्फोट; ४ कामगारांचा मृत्यू

दिसपुर : आसाममधील कछार जिल्ह्यात रविवारी सकाळी रॉड उत्पादन करणाऱ्या एका कारखान्यात भीषण स्फोट होऊन किमान चार

Viral Love Story : NEET आंदोलनात गेले अन् जुळली रेशीमगाठ; जंतर-मंतरवर घडली अनोखी प्रेमकहाणी

Viral Love Story : दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेले नीट परीक्षा गैरप्रकाराविरोधातील आंदोलन देशभर चर्चेत