अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे अमरावती, नागपूरमधील पेपर फुटीचे प्रकरण चर्चेत असतानाच सांगोल्यामध्ये प्रश्नपत्रिका चोरल्याची घटना घडली होती. सांगोला विद्यामंदिर येथील स्ट्रॉंग रूमचे कुलूप तोडून ५० प्रश्नपत्रिका पळवल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी आता सर्वात महत्त्वाची अपडेट समोर आली असून विद्यार्थ्यानेच ही चोरी केल्याची कबुली दिली आहे.



विद्यार्थ्यानेच प्रश्नपत्रिका पळवली



याबाबत सविस्तर माहिती अशी की, सांगोला येथून दहावी बोर्डाची भूगोलाची प्रश्नपत्रिका चोरीला गेल्याची घटना घडली. यानंतर या संपूर्ण प्रकाराची पोलिसांनी सखोल चौकशी करत तपास केला. यामध्ये भूगोलाचा पेपर झाल्यानंतर एका इलेक्ट्रिक बाइकवरून आलेल्या दहावीत शिकणाऱ्याच मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. यानंतर या मुलाने आपणच पेपर चोरला असल्याची कबुली दिली आहे.


महत्त्वाचे म्हणजे सगळे पेपर सोपे गेले भूगोलाचा अभ्यास झाला नाही. म्हणून चोरीची घटना घडली असल्याचा अनुमान सांगोल्यात लावला जात आहे. या चोरी प्रकरणात अल्पवयीन मुलाने वापरलेली इलेक्ट्रिक दुचाकी तसेच चोरलेली प्रश्नपत्रिका पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या धक्कादायक प्रकाराने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून शिक्षण व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे दिसत आहे.

Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच