Weather Update: महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना अलर्ट, ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार

मुंबई: महाराष्ट्रावर ऐन उन्हाळ्यात अस्मानी संकट घोंघावत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला उष्णतेच्या लाटेने तडाखा दिला. तर मध्यावर वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसानं चिंता वाढवली आहे. १८ ते २० मार्चदरम्यान राज्यातील विविध ठिकाणी वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. काही भागांत यलो अलर्ट जारी केला असून मंगळवारचं हवामान अपडेट जाणून घेऊयात.


उष्णतेच्या लाटेनंतर वादळी पाऊस विदर्भाला झोडपून काढत आहे. आज नागपूरसह 7 जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या काळात ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहतील. काही ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते. दिवसाचे कमाल तापमान ३२-३८ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहील. मराठवाड्यात देखील नांदेड, लातूर आणि धाराशिव या तीन जिल्ह्यांना मंगळवारी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील. तसेच हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि तुरळक ठिकाणी गारपीट होईल. छत्रपती संभाजीनगरसह, बीड, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत देखील हलक्या पावसाची शक्यता आहे.


मध्य महाराष्ट्रातील पुण्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यांतील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह तुरळक ते हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. पुण्यात ढगाळ वातावरण राहील. तर सोलापूर जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तापमान २८-३४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जगळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांत हवामान उष्ण आणि कोरडे राहील. या ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३०-३६ अंश सेल्सिअसदरम्यान राहील. तुरळक पाऊस आणि वादळाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.


कोकणात मंगळवारी हवामान उष्ण आणि कोरडं राहील. गेल्या काही काळात असणारी दमट हवामानाची तीव्रता कमी झाली आहे. काही ठिकाणी आकाश ढगाळ राहील. तर १८ मार्चपासून मुंबईसह कोकणात हलक्या पावसाची शक्यता आहे. बुधवार आणि गुरुवारी रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात उष्णतेची लाट, गारपीट, अकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांचं संकट आहे. त्यामुळे काढणीला आलेली पिके आणि फळ बागांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची योग्य ती काळजी घ्यावी. तसेच नागरिकांनी देखील बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची काळजी घ्यावी.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा