धर्मस्वातंत्र्य कायद्यामुळे आमिष, बळजबरी करणाऱ्यांचे कंबरडे मोडणार!

मुंबई : राज्यातील १४ कोटी जनतेच्या सुरक्षिततेसाठी आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने 'धर्मस्वातंत्र्य विधेयक' मंजूर केले आहे. आमिष किंवा दबाव टाकून धर्मांतर करणाऱ्या संस्थांचे कंबरडे आता या कायद्यामुळे मोडले जाईल.," असे सांगून या कायद्याचे समर्थन करणारे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभारही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मानले.


बावनकुळे म्हणाले की, "देशातील १२ राज्यांनी यापूर्वीच हा कायदा केला असून आता महाराष्ट्रही त्यात सामील झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदा करताना अतिशय काळजीपूर्वक मांडणी केली आहे. तथापि, या विषयावरून आमदार जितेंद्र आव्हाडांचे मानसिक संतुलन बिघडले. ते केवळ आपल्या मतदारसंघातील ७० टक्के विशिष्ट मतदारांना खूश करण्यासाठी गलिच्छ राजकारण करत आहेत.


* समन्वय समितीची बैठक पुढील आठवड्यात : महायुतीची समन्वय समितीची बैठक पुढील आठवड्यात होईल आणि मित्रपक्षांनी मांडलेल्या मुद्द्यांवर तिथे सविस्तर चर्चा केली जाईल.


* तक्रार जशी आली, तशी पुढे ! : आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरोधातील तक्रारीबाबत बावनकुळे म्हणाले, मंत्री म्हणून माझ्याकडे कुणीही तक्रार केली, तर तिची चौकशी करण्याचे आदेश देणे हे माझे कर्तव्य आहे. मंत्रालयातील कामकाजाच्या पद्धतीनुसार, तक्रार अर्ज जसा येतो तसाच तो चौकशीसाठी संबंधित कार्यालयाकडे पाठवला जातो. यात कोणताही वैयक्तिक हस्तक्षेप नाही. नरेंद्र मेहता यांनी काहीही चुकीचे केलेले नाही"


* ओरिसात मोदींच्या विकासापुढे काँग्रेस हतबल : ओडिशा राज्यसभा निवडणुकीत भाजपाचे केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून विजयानंतर आपली भूमिका स्पष्ट करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओरिसामध्ये जी विकासकामे केली आहेत, त्या कामांच्या जोरावर तेथील काँग्रेसचे आमदारही आता आपल्याच पक्षाला मतदान करायला तयार नाहीत. 'तुम्ही आता विकास करू शकत नाही, केवळ भाजपच विकास करू शकतो' असे ठणकावून सांगत काँग्रेसच्या आमदारांनी सर्वांसमक्ष भाजपला मतदान केले आहे. ओरिसाचे राजकारण बदलण्याच्या दृष्टीने हा मोठा प्रयत्न असून मोदींच्या विकासाची ही लाट आता देशव्यापी झाली आहे."

Comments
Add Comment

मुंबई वॉटर मेट्रो जलवाहतूक प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : "मुंबई महानगर प्रदेशात जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्येही आता 'स्वीकृत सदस्य'

मुंबई : महापालिका, नगरपालिकांप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्येही 'स्वीकृत सदस्यां'च्या नियुक्तीचा

आमदार हेमंत पाटील यांनी मांडली 'लव्ह जिहाद' आणि 'लोकसंख्या नियंत्रणाची' आग्रही भूमिका

विधान परिषदेत धर्मांतर विरोधी विधेयकावर चर्चा मुंबई : विधान परिषदेत आज धर्मांतर विरोधी विधेयकावर अत्यंत

कोकणातील आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना अधिवेशन संपण्यापूर्वीच मुख्यमंत्री नुकसानभरपाई जाहीर करणार

मुंबई : कोकणातील आंबा व काजू पिकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आज विधान भवन, मुंबई येथे आदरणीय मुख्यमंत्री

धर्मांतर विरोधी विधेयकात घुमला २००४ चा आवाज, डॉ. नीलम गोऱ्हेंनी सभागृहात जागवल्या जुन्या आठवणी

मुंबई: महाराष्ट्रात प्रलोभन किंवा बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या समस्येला आळा घालण्यासाठी आज विधान परिषदेत

धर्मांतर हा श्रद्धेचा विषय, व्यवहाराचा नाही!"; विधान परिषदेत आमदार प्रवीण दरेकरांची ठाम भूमिका

मुंबई: "धर्म हा केवळ मानवी श्रद्धेचा भाग असून त्याचा व्यवहारासाठी किंवा स्वार्थासाठी वापर करणे चुकीचे आहे.