कोकणचा राजा दाखल! एपीएमसीत ६ हजार पेट्यांची विक्रमी आवक; पण 'हापूस' अद्याप महागच

नवी मुंबई : आंबा प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे! कोकणच्या लाल मातीतील अस्सल हापूस आंब्याची नवी मुंबईतील एग्रीकल्चर प्रोड्युस मार्केट कमिटी (APMC) बाजारपेठेत मोठी एन्ट्री झाली आहे. सोमवारी बाजारपेठेत तब्बल ६,००० पेट्यांची आवक झाली असून, चालू हंगामातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी आवक मानली जात आहे. यंदा कोकणात वातावरणात वारंवार होणारे बदल, अनपेक्षित धुके आणि तापमानातील चढ-उतार यामुळे आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे. कीड आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात आंबा खराब झाला असून, कोकणातील बागायतदारांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. आवक वाढली असली तरी दर्जेदार आंब्याचे प्रमाण मर्यादित असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.





खिशाला बसणार 'चटका'


बाजारात आवक वाढल्याने दर कमी होतील अशी अपेक्षा खवय्यांना होती, मात्र सध्या तरी दर चढेच आहेत. सद्यस्थितीत बाजारपेठेत एका पेटीचा दर ४,००० ते ९,००० रुपयांच्या घरात आहे. पुढील काही दिवसांत आवक आणखी वाढण्याची शक्यता असली, तरी उत्पादनातील घट पाहता दरात मोठी घसरण होण्याची शक्यता कमीच असल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. कोकणातील शेतकरी सध्या नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आहे. त्यामुळे आंबा खवय्यांनी दराची फारशी तमा न बाळगता, थोडीशी खिशाला कात्री लावून आंबा खरेदी करावा आणि संकटात सापडलेल्या बळीराजाला साथ द्यावी, असे आवाहन एपीएमसीतील व्यापाऱ्यांनी केले आहे.

Comments
Add Comment

SIR in Mumbai : 'मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेत राजकीय पक्षांचे सहकार्य आवश्यक'

मुंबई : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह

Illegal Water Connections : बांधकामांच्या ठिकाणच्या १०७ जलजोडण्यावर पालिकेची कारवाई

४१८ अनधिकृत जलजोडण्या खंडित, १०२ बुस्टर जप्त मुंबई : पावसाळा लांबणीवर पडल्याने मुंबईत १५ मे २०२६ पासून १० टक्के

Ghatkopar : घाटकोपर परिसरातील पदपथांवरील ४ अनधिकृत दुकाने आणि ३ वाचनालयांवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर परिसरातील संत ज्ञानेश्वर मार्ग, पंतनगर येथील पदपथांवर अडथळा निर्माण करणाऱ्या ४

Pune Traffic Update : पुणे पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीत बदल, जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यायी मार्गांची घोषणा

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ८ जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. या

Ford Employees : नारळ दिलेल्या कर्मचाऱ्यांनाच पुन्हा बोलावण्याची फोर्डवर वेळ, एआयचा प्रयोग ठरला अपुरा

नवी दिल्ली : विविध उद्योगांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)चा वापर झपाट्याने वाढत असून अनेक कंपन्या

India in Venezuela : व्हेनेझुएलामधील भारताची मदत मोहीम अधिक तीव्र; चोवीस तास मोफत वैद्यकीय सेवा सुरू

व्हेनेझुएला : ऑपरेशन ‘अमिस्ताद’ (Amistad)अंतर्गत भूकंपग्रस्त व्हेनेझुएलामध्ये तैनात भारतीय लष्कराचे फील्ड