कोकणचा राजा दाखल! एपीएमसीत ६ हजार पेट्यांची विक्रमी आवक; पण 'हापूस' अद्याप महागच

नवी मुंबई : आंबा प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे! कोकणच्या लाल मातीतील अस्सल हापूस आंब्याची नवी मुंबईतील एग्रीकल्चर प्रोड्युस मार्केट कमिटी (APMC) बाजारपेठेत मोठी एन्ट्री झाली आहे. सोमवारी बाजारपेठेत तब्बल ६,००० पेट्यांची आवक झाली असून, चालू हंगामातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी आवक मानली जात आहे. यंदा कोकणात वातावरणात वारंवार होणारे बदल, अनपेक्षित धुके आणि तापमानातील चढ-उतार यामुळे आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे. कीड आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात आंबा खराब झाला असून, कोकणातील बागायतदारांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. आवक वाढली असली तरी दर्जेदार आंब्याचे प्रमाण मर्यादित असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.





खिशाला बसणार 'चटका'


बाजारात आवक वाढल्याने दर कमी होतील अशी अपेक्षा खवय्यांना होती, मात्र सध्या तरी दर चढेच आहेत. सद्यस्थितीत बाजारपेठेत एका पेटीचा दर ४,००० ते ९,००० रुपयांच्या घरात आहे. पुढील काही दिवसांत आवक आणखी वाढण्याची शक्यता असली, तरी उत्पादनातील घट पाहता दरात मोठी घसरण होण्याची शक्यता कमीच असल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. कोकणातील शेतकरी सध्या नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आहे. त्यामुळे आंबा खवय्यांनी दराची फारशी तमा न बाळगता, थोडीशी खिशाला कात्री लावून आंबा खरेदी करावा आणि संकटात सापडलेल्या बळीराजाला साथ द्यावी, असे आवाहन एपीएमसीतील व्यापाऱ्यांनी केले आहे.

Comments
Add Comment

UAE to withdraw from OPEC : ६० वर्षांनंतर यूएई ओपेकमधून बाहेर पडणार; जागतिक तेलबाजारात खळबळ

अबुधाबी : संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) सुमारे ६० वर्षांनंतर ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्स्पोर्टिंग कंट्रीज

Massajog Election Result : मस्साजोग पोटनिवडणूकीत अश्विनी देशमुख पराभूत, वहिनीच्या पराभवावर धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया म्हणाले...

बीड : दीड वर्षांपूर्वी संतोष देशमुख हत्या प्रकरणाने महाराष्ट्राच राजकारणं ढवळून निघालं होतं. 9 डिसेंबर 2024 रोजी

Watermelon Death Case : कलिंगड खाल्लं अन् एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू; दुकानदारानेच सांगितलं सत्य

मुंबई : बिर्याणी त्यानंतर थंडावा मिळावा म्हणून खाल्लेलं कलिंगड आणि थेट मृत्यू किती भयंकर आहे ना हे, मुंबईतील

Jalgaon accident : भीषण अपघातात नववधूसह तिघांचा दुर्दैवी अंत; वऱ्हाड घेऊन निघालेल्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

Jalgaon accident : जळगाव जिल्ह्यातुन एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्याच्या धरणगावमध्ये (Dharangaon Accident News) एक अतिशय

Bacchu Kadu, Eknath Shinde : विधान परिषद दिली तर शिंदेंचा पाईक म्हणून काम करेन - बच्चू कडू

मुंबई : "उमेदवारी अर्जासोबत जोडायची कागदपत्रे माझ्या बॅगेतच आहेत. जर शिवसेनेने सन्मानाने उमेदवारी दिली, तर

महिला आरक्षण विधेयकासाठी महायुती सरकार मैदानात, घेतला मोठा निर्णय

महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी महायुती सरकार आता मैदानात उतरले आहे. लवकरच महायुती सरकार महिला