कोकणचा राजा दाखल! एपीएमसीत ६ हजार पेट्यांची विक्रमी आवक; पण 'हापूस' अद्याप महागच

नवी मुंबई : आंबा प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे! कोकणच्या लाल मातीतील अस्सल हापूस आंब्याची नवी मुंबईतील एग्रीकल्चर प्रोड्युस मार्केट कमिटी (APMC) बाजारपेठेत मोठी एन्ट्री झाली आहे. सोमवारी बाजारपेठेत तब्बल ६,००० पेट्यांची आवक झाली असून, चालू हंगामातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी आवक मानली जात आहे. यंदा कोकणात वातावरणात वारंवार होणारे बदल, अनपेक्षित धुके आणि तापमानातील चढ-उतार यामुळे आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे. कीड आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात आंबा खराब झाला असून, कोकणातील बागायतदारांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. आवक वाढली असली तरी दर्जेदार आंब्याचे प्रमाण मर्यादित असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.





खिशाला बसणार 'चटका'


बाजारात आवक वाढल्याने दर कमी होतील अशी अपेक्षा खवय्यांना होती, मात्र सध्या तरी दर चढेच आहेत. सद्यस्थितीत बाजारपेठेत एका पेटीचा दर ४,००० ते ९,००० रुपयांच्या घरात आहे. पुढील काही दिवसांत आवक आणखी वाढण्याची शक्यता असली, तरी उत्पादनातील घट पाहता दरात मोठी घसरण होण्याची शक्यता कमीच असल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. कोकणातील शेतकरी सध्या नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आहे. त्यामुळे आंबा खवय्यांनी दराची फारशी तमा न बाळगता, थोडीशी खिशाला कात्री लावून आंबा खरेदी करावा आणि संकटात सापडलेल्या बळीराजाला साथ द्यावी, असे आवाहन एपीएमसीतील व्यापाऱ्यांनी केले आहे.

Comments
Add Comment

व्हॅल्युअर्सना मिळणार न्याय! महिनाभरात बँकांसोबत विशेष बैठक घेण्याची मंत्री पंकज भोयर यांची विधानपरिषदेत ग्वाही

मुंबई : राज्यातील सुवर्णकार आणि बँकांमध्ये सोने तारण कर्ज प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 'गोल्ड

‘तक्रार केल्यास काम अडवू’! सिंधुदुर्गमधील ठाकर बांधवांना अधिकाऱ्यांकडून दमदाटी - आमदार निलेश राणे विधानसभेत आक्रमक

भात खरेदीच्या थकबाकीवरूनही विचारला जाब मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाला जात पडताळणीसाठी ५००

'महाराष्ट्र देशाचे आर्थिक पॉवर हाऊस आणि 'स्टार्टअप कॅपिटल', गुंतवणुकीसाठी उत्तम राज्य'

मुंबई : महाराष्ट्र हे देशातील सर्वात जास्त परकीय गुंतवणूक असलेले राज्य आहे. हे देशाचे आर्थिक पॉवर हाऊस असून

पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने पाणीदार महाराष्ट्राचा संकल्प -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : ' पाणी फाउंडेशन' ने महाराष्ट्राच्या जलसंधारण क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. या फाउंडेशनने राज्य

उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त पुण्यातून धावणार ३३४ उन्हाळी विशेष ट्रेन

पुणे : परीक्षा संपली की वेध लागतात ते सुट्टीचे, बाहेरगावी फिरायला जायचे, त्यामुळे उन्हाळ्यात रेल्वेवर

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, भाजपची १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शुभेंदू अधिकारी