नायगाव बीडीडी चाळीतील ८६४ कुटुंबांचे गृहस्वप्न पूर्ण

- मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चाव्यांचे वितरण; १६० चौ.फुटांच्या खोलीत आयुष्य काढलेल्यांना मिळाले ५०० चौ.फुटांचे घर


मुंबई : नायगाव येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत ८६४ कुटुंबांना त्यांच्या हक्काच्या नव्या घरांच्या चाव्या सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित करण्यात आल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील पुनर्वसन सदनिकांच्या या वितरण सोहळ्यात, अनेक वर्षांपासून चांगल्या घराची प्रतीक्षा करणाऱ्या रहिवाशांच्या चेहऱ्यावर समाधान आणि भावनिक क्षण अनुभवायला मिळाले. मुख्यमंत्र्यांनी ८० वर्षीय शोभा गायकवाड यांना घराची पहिली चावी सुपूर्द केली, त्यावेळी उपस्थितांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.


या कार्यक्रमाला विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री पंकज भोयर आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अनेक दशकांपासून बीडीडी चाळीतील रहिवासी १६० चौरस फुटांच्या अतिशय लहान आणि जीर्ण झालेल्या घरांमध्ये कठीण परिस्थितीत राहत होते. आता त्यांना ५०० चौरस फुटांचे अत्याधुनिक सोयीसुविधांनीयुक्त घर देण्यात आले आहे.


हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प दोन टप्प्यांत राबविला जात आहे. ६.४५ हेक्टर क्षेत्रावर असलेल्या तळ अधिक तीन मजल्यांच्या ४२ चाळींमध्ये सध्या ३ हजार ३४४ भाडेकरू वास्तव्यास असून, त्यांचे पुनर्वसन करण्याचे उद्दिष्ट आहे. एकूण २३ मजल्यांच्या २० पुनर्वसन इमारती उभारल्या जात आहेत. पहिल्या टप्पात प्लॉट 'ब' मधील १ हजार ४०१ रहिवाशांना पहिल्या टप्प्यात पुनर्वसित करण्यात येणार आहे. त्यापैकी ८ इमारतींमधील ५ इमारतींमधील ८६४ सदनिकांचे वितरण पूर्ण झाले आहे. उर्वरित ५३७ सदनिकांचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून, एप्रिल २०२६ पर्यंत ते पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.


प्लॉट 'अ' मधील १९ चाळींच्या जागेवर दुसऱ्या टप्प्यात १२ पुनर्वसन इमारती प्रस्तावित आहेत, त्यापैकी ३ इमारतींचे काम सध्या सुरू आहे. पुनर्वसनाधीन रहिवाशांना तात्पुरत्या संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले असून, त्यांना भाडे किंवा संक्रमण गाळा निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच, प्रति महिना २५ हजार रुपये याप्रमाणे ११ महिन्यांचे आगाऊ भाडेही दिले जात आहे.



आधुनिक घरांची वैशिष्ट्ये :


- दोन ते तीन पिढ्यांपासून लहान घरात राहणाऱ्या कुटुंबांना आता ५०० चौरस फुटांचे २ बीएचके घर मिळाले आहे. या नव्या इमारतींमध्ये व्हिट्रीफाईड फरशा, अॅल्युमिनियम खिडक्या, ग्रॅनाइट स्वयंपाक ओटा, अग्निरोधक यंत्रणा, ब्रँडेड प्लंबिंग, दोन प्रवासी लिफ्ट, एक अग्निशमन लिफ्ट, प्रत्येक मजल्यावर सीसीटीव्ही, बेसमेंट पार्किंग आणि भूकंपरोधक तंत्रज्ञानाचा वापर यांसारख्या आधुनिक सुविधांचा समावेश आहे.


- या प्रकल्पाअंतर्गत एक स्वयंपूर्ण वसाहत उभारली जात आहे. यामध्ये शाळा, वेलफेअर सेंटर, मलनिस्सारण प्रकल्प, सौरऊर्जा प्रणाली, पर्जन्यजल संकलन यांसारख्या सुविधा उपलब्ध असतील. विशेष म्हणजे, इमारतींच्या सामायिक सुविधांची देखभाल 'म्हाडा'कडून पुढील १२ वर्षांसाठी केली जाणार आहे, त्यामुळे रहिवाशांवर देखभाल खर्चाचा (मेन्टेनन्स) भार पडणार नाही.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र