APMC Market : आंबा खवय्यांना पर्वणी; एपीएमसी बाजारात तब्बल सहा हजार पेट्यांची आवक

नवी मुंबई : नवी मुंबईतील एपीएमसी बाजार येथे कोकणातून येणाऱ्या आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. तब्बल सहा हजार पेट्या बाजारात दाखल झाल्याने आंबा खवय्यांसाठी ही एक पर्वणी ठरली आहे. मात्र आंब्याचे दर अजूनही वरचढ असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.


मागील काही दिवसांपासून कोकणातून येणाऱ्या आंब्याची आवक वाढू लागली असून आज नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात तब्बल सहा हजार पेट्यांची आवक झाली आहे. चालू हंगामातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी आवक असल्याचे सांगितले जात आहे.


मात्र वातावरणातील सतत होणारे बदल, धुके आणि तापमानातील चढउतार यामुळे आंबा पिकावर परिणाम झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आंबा खराब होऊन कोकणातील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.


सध्या बाजारात एका पेटीचा दर सुमारे चार हजार ते नऊ हजार रुपयांपर्यंत आहे. पुढील काही दिवसांत आंब्याची आवक वाढण्याची शक्यता असली तरी दर मात्र वरचढ राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.


दरम्यान, कोकणातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता आंबा खवय्यांनी थोडीशी खिशाला कात्री देत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे आवाहनही आंबा व्यापाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

UAE to withdraw from OPEC : ६० वर्षांनंतर यूएई ओपेकमधून बाहेर पडणार; जागतिक तेलबाजारात खळबळ

अबुधाबी : संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) सुमारे ६० वर्षांनंतर ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्स्पोर्टिंग कंट्रीज

Massajog Election Result : मस्साजोग पोटनिवडणूकीत अश्विनी देशमुख पराभूत, वहिनीच्या पराभवावर धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया म्हणाले...

बीड : दीड वर्षांपूर्वी संतोष देशमुख हत्या प्रकरणाने महाराष्ट्राच राजकारणं ढवळून निघालं होतं. 9 डिसेंबर 2024 रोजी

Watermelon Death Case : कलिंगड खाल्लं अन् एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू; दुकानदारानेच सांगितलं सत्य

मुंबई : बिर्याणी त्यानंतर थंडावा मिळावा म्हणून खाल्लेलं कलिंगड आणि थेट मृत्यू किती भयंकर आहे ना हे, मुंबईतील

Jalgaon accident : भीषण अपघातात नववधूसह तिघांचा दुर्दैवी अंत; वऱ्हाड घेऊन निघालेल्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

Jalgaon accident : जळगाव जिल्ह्यातुन एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्याच्या धरणगावमध्ये (Dharangaon Accident News) एक अतिशय

Bacchu Kadu, Eknath Shinde : विधान परिषद दिली तर शिंदेंचा पाईक म्हणून काम करेन - बच्चू कडू

मुंबई : "उमेदवारी अर्जासोबत जोडायची कागदपत्रे माझ्या बॅगेतच आहेत. जर शिवसेनेने सन्मानाने उमेदवारी दिली, तर

महिला आरक्षण विधेयकासाठी महायुती सरकार मैदानात, घेतला मोठा निर्णय

महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी महायुती सरकार आता मैदानात उतरले आहे. लवकरच महायुती सरकार महिला